Amalner

?रणधुमाळी ग्रामपंचायतीची..अमळनेर तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत 29 उमेदवारांचे अर्ज अवैध तर 1348 अर्ज वैध..

?रणधुमाळी ग्रामपंचायतीची..अमळनेर तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत 29 उमेदवारांचे अर्ज अवैध तर 1348 अर्ज वैध..

अमळनेर येथे 67 ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या पार्श्वभूमीवर 1377 अर्ज दि 30 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी6 वाजे पर्यंत दाखल करण्यात आले होते. यात काल संध्याकाळ पर्यंत दाखल अर्जांची छाननी करण्यात आली यात 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.एकूण अर्जांची संख्या 1348 एव्हढी असून दि 4 जाने 2021 रोजी माघार घेण्याची मुदत आहे.माघारीनंतर ग्राम पंचायत निवडणूकीच्या मैदानातील खरे चित्र स्पष्ट होईल.

अमळनेर तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींसाठी एकूण 1377 अर्ज दाखल झाले होते.5 ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या असून 29 उमेदवारांचे अर्ज विविध कारणास्तव बाद झाले आहेत. एक उमेदवार सातवी पास नसून दोन लोकांचे मतदार यादीत नाव नाही. काही अर्ज जात वैधता प्रमाणपत्र टोकन नसल्याने बाद करण्यात आले आहेत.अशी माहिती निवडणूक अधिकारी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button