Amalner

हजारो महिला पडल्या ‘अंधश्रद्धेला’ बळी चांगल्याच प्रकारे तेलाची व गव्हाच्या पिठाची झाली नासाडी

हजारो महिला पडल्या ‘अंधश्रद्धेला’ बळी
चांगल्याच प्रकारे तेलाची व गव्हाच्या पिठाची झाली नासाडी

रजनीकांत पाटील
अमळनेर : तालुक्यातील नाही तर खेड्यातही निंबा च्या झाडा खाली दिवे लावले तर कोरोना ची लागण होणार नाही अशी जोरदार अफवा पसरली. सोशल मीडियावर पसरलेल्या या अफवे वर हजारोंनी ठेवला विश्वास मात्र काही भागात तर वेगळी चर्चा ऐकण्यास मिळाली.

तृतीयपंथी(किन्नरा)चा अक्सिडंट झाला तर कोणी मृत्यू झाल्याचे सांगत त्याने कोरोनाच्या आजारा ला श्राप दिल्याचे की ज्या बाई ला एक कुलता एक मुलगा असेल (आजच्या हम दो हमारे दो च्या काळात बऱ्याच आई वडिलांना एक कुलता एक असतो)
अशा एकुलत्या एक मुल असलेल्या आई वडिलांनी लिंबाचा झाडाला पाच कणीकाचे दिवे लावावे. तरच कोरोना आजारापासून तुमचा मुलगा दूर होईल.
अशी मनाला धक्का लावनारी अफवा संपूर्ण गावागावांत पसरली
आजच्या परिस्थितीत हजारो महिलांकडून यामुळे तेलाची व गव्हाच्या पिठाची चांगलीच वाट लागली.गरीब लोकांना आणीबाणी च्या वेळीस हेच अन्न दिले असते.गरीबांनी लाख मोलाच्या दुवा दिल्या असता. या बाबत संपुर्ण गावात चर्चा झाली. गावातील महिलांची दिशाभूल झाली. अशा या बातमीचा जन्मदाता कोण आहे. याचा अद्यापही शोध नाही.

अफवेस बळी पडू नये.
कुठल्याही अफवेस बळी न पडता. लिंबाच्या झाडाला दिवा लावण्यास जाऊ नये.
आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री प्रशासन,डॉक्टर, आरोग्य कर्मचारी,पोलीस डिपार्टमेंट, शास्त्रज्ञ आपल्या साठी दिवस रात्र काम करत आहे.आणि आपल्या आरोग्यासाठी आपणास घरी राहा असा सल्ला देत आहे. आणी असे असतांना ही आपले महिला बघीनी रस्त्यावर लिंबाचे झाड शोधत आहे. व दिवा लावण्यासाठी बाहेर पडत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button