Amalner

पातोंडा ग्रामपंचायतीचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर… इच्छुकांनी केली मोर्चे बांधणीला सुरूवात…

पातोंडा ग्रामपंचायतीचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर… इच्छुकांनी केली मोर्चे बांधणीला सुरूवात…

प्रतिनिधी : रजनीकांत पाटील अमळनेर


अमळनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या व राजकारण्यांचा चांगलाच हिरमोड झाला. सप्टेंबर महिन्यात पातोंडा ग्रा पं ची मुदत संपली व विस्तार अधिकारी चिंचोले यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतली. परंतू याच आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी वार्ड निहाय आरक्षण घोषीत केल्या व इच्छूकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पातोंडा हे गाव मोठे असून गावाचे पाच प्रभाग असून 13 सदस्य आहेत. प्रत्येक पंचवार्षिक निवडणूकीत वार्ड रचना बदलली जाते त्यानुसार या वर्षी वार्ड क्रमांक तीन मधील माजी सरपंच गजानन फकिरा बिरारी यांचे घरापासून ते संतोष उखा बिरारी यांचे घरापर्यंतचा संपूर्ण भाग वार्ड क्रमांक एकला जोडण्यात आला आहे. दोन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी मुंबई ग्रा पं अधिनियम 1966 मधील नियम 5 (I) नुसार वार्ड निहाय आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार वार्ड क्रमांक एक मधे तिन जागा असून सर्वसाधारण – 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग – 1, सर्वसाधारण महिला एक, वार्ड क्रमांक दोन मधे दोन जागा असून नागरीकांचा मागास प्रवर्ग – 1, सर्वसाधारण महिला – 1, वार्ड क्रमांक तीनमध्ये देखील दोन जागा असून सर्वसाधारण – 1 व सर्वसाधारण महिला – 1, वार्ड क्रमांक चार मधे तीन जागा असून अनूसूचीत जमाती – 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला – 1, सर्वसाधारण महिला – 1, वार्ड क्रमांक पाच मधे तीन जागा असून अनूसूचीत जाती – 1, अनूसुचीत जाती महिला – 1 व नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला – 1 या प्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले असून सात जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे मागील पंचवार्षिक प्रमाणेच महिला राज असण्याची चर्चा नागरीकांमधून होत आहे. मागील वर्षी निवडणूकीच्या वेळी तयार झालेले पॅनल मध्यंतरीच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडीत संपुष्टात आल्याची चर्चा असून आता नवीन सूत्रे काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. बंद असलेली निवडणूक प्रक्रीयेची पुर्वतयारी सुरू झाल्याने डिसेंबर च्या शेवटच्या किंवा जानेवारी च्या पहिल्या पंधरवाड्यात ग्रा पं निवडणूका लागण्याची शक्यता असल्याचे मत राजन बिरारी यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया…

” तेरा पैकी सात जागा महिलांकरीता आरक्षित आहेत तसेच इतर जागांवर देखील महिलांनी निवडणूक लढवली तर सर्व ग्रा पं मधे महिला राज येण्याची शक्यता नाकारता येत नाही.” – सौ शितल महेंद्र पाटील, माजी सरपंच पातोंडा
” वार्ड रचना व आरक्षण बदलल्याने निवडणूकीची सर्वच सुत्रे बदलली आहेत त्यामुळे प्रस्थापित व राजकारणात नवीन असणा-या सर्वांनाच नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.” – सौ मनिषा प्रविण बिरारी, माजी सरपंच पातोंडा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button