कृषी रेल्वेतून वाहतुकीसाठी द्राक्ष,ॲपल बोर यांना सबसिडी उपलब्ध करून द्यावी: खा.हेमंत गोडसे यांचे कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना निवेदन.
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : देशात सर्वाधिकमहाराष्ट्रात कृषि उत्पादनात नाशिक अग्रेसर असून येथे उत्पादित शेतमालाला देशभरातील बाजारपेठत सहज पोहचविता यावे,याकरिता केंद्र
शासनाच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी देवळाली रेल्वे स्थानकातून देवळाली ते दानापूर रेल्वे ही विशेष कृषि रेल्वे सुरु करण्यात येतआहे. या रेल्वेगाडीमुळे नाशिकसह परिसरातील कृषि उत्पादने अवघ्या काही तासात कुठल्याही बाजारपेठेत पोहचविणे सहज शक्य होत आहे. नाशिक द्राक्ष उत्पादनात देशभरात प्रसिद्ध आहे. याकरिता मात्र कृषी रेल्वेतून वाहतुकीसाठी द्राक्ष, ॲपलबोर तसेच काही भाजीपाल्याला पन्नास टक्के सबसिडीतून वगळण्यात आले असल्याणे वरील पिकांचा रेल्वे वाहतुकीच्या पन्नास टक्के सबसिडीमध्ये तातडीने समावेश व्हावा, अशी आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय कृषी तथा अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे. रेल्वेतून वाहतुकीसाठी द्राक्ष,ॲपल बोर यांना सबसिडी उपलब्ध करून द्यावी: खा.हेमंत गोडसे यांचे कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना निवेदन. सुनिल घुमरे नाशिक नाशिक : देशात सर्वाधिकमहाराष्ट्रात कृषि उत्पादनात नाशिक अग्रेसर असून येथे उत्पादित शेतमालाला देशभरातील बाजारपेठत सहज पोहचविता यावे,याकरिता केंद्र
शासनाच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी देवळाली रेल्वे स्थानकातून देवळाली ते दानापूर रेल्वे ही विशेष कृषि रेल्वे सुरु करण्यात येतआहे. या रेल्वेगाडीमुळे नाशिकसह परिसरातील कृषि उत्पादने अवघ्या काही तासात कुठल्याही बाजारपेठेत पोहचविणे सहज शक्य होत आहे. नाशिक द्राक्ष उत्पादनात देशभरात प्रसिद्ध आहे. याकरिता मात्र कृषी रेल्वेतून वाहतुकीसाठी द्राक्ष, ॲपलबोर तसेच काही भाजीपाल्याला पन्नास टक्के सबसिडीतून वगळण्यात आले असल्याणे वरील पिकांचा रेल्वे वाहतुकीच्या पन्नास टक्के सबसिडीमध्ये तातडीने समावेश व्हावा, अशी आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय कृषी तथा अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे.