Chalisgaon

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर १०० टक्के भरलेल्या मन्याड धरणाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या व मान्यवरांच्या हस्ते जलपूजन

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर १०० टक्के भरलेल्या मन्याड धरणाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या व मान्यवरांच्या हस्ते जलपूजन

मनोज भोसले

चाळीसगाव तालुक्याचा सिंचन पॅटर्न निर्माण करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार.

चाळीसगाव तालुक्यातील २२ हुन अधिक गावांना संजीवनी ठरणारे व अनेक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असणारे मन्याड धरण जवळपास ३ वर्षाचा भीषण दुष्काळानंतर पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले असून चाळीसगाव तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते धरणाचे जलपूजन पवित्र अश्या मंत्रोच्चारात संपन्न झाले.
मार्केट सभापती रविंद्र चुडामन पाटील,
उपसभापती महेंद्र पाटील,
भाजपा माजी तालुकाध्यक्ष सुरेशतात्या सोनवणे, नांद्रे काकळणे गृप ग्रामपंचायत सरपंच सौ.अनुराधा महेंद्र पाटील,
मार्केट संचालक धर्मा खंडू काळे,
भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील,
शिवसेना नगरसेवक नानाभाऊ कुमावत,
नगरसेविका विजयाताई पवार, भास्कर पाटील,
सायगावचे सरपंच नथु पैलवान, उपसरपंच शंकर विठ्ठल महाजन,
माजी पं स सदस्य संभाजीराजे पाटील,
युंवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण, तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी,
भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, मनोज साबळे,
शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव खलाणे,
विकासो चेअरमन साहेबराव उत्तमराव पाटील, गिरणा पाटबंधारे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, नांद्रे येथील भावडू दादा,
पिंप्री प्रदे उपसरपंच शरद जुलाल पाटील, अशोक पाटील, रोहिदास पाटील,
अलवाडी येथील गोरख अप्पा, ज्ञानेश्वर पाटील, समाधान पाटील,संजय पाटील, शिरसगाव सरपंच दिगंबर पाटील, वसंत चव्हाण, दिलीप पाटील, अभिराज चव्हाण, आबा बछे, शिवाजी सोनवणे, रविंद्र विश्वास पाटील, राम गोविंदराव पाटील, आडगाव सरपंच रावसाहेब पाटील, हिरे भाऊसाहेब, प्रवीण पवार सर यांच्यासह मन्याड धरण कृती समितीचे पदाधिकारी, परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो चेअरमन व संचालक, विविध पक्ष – संघटनांचे पदाधिकारी – कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले की मी एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतीसाठी पाण्याचे किती महत्व आहे याची जाणीव मला आहे. आपल्या आशिर्वादाने मी आमदार झालो असून राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नामदार गिरिषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून राज्याच्या जलआराखड्यात मन्याड धरणासाठी १ टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. मन्याड धरण कृती समिती व सर्व नेतेमंडळी यांना सोबत घेऊन धरणाची उंची वाढविणे, वाटर ग्रीडच्या माध्यमातून गिरणा – मन्याड धरण लिंक व अजून ज्या काही उपाययोजना असतील त्याबाबत ठोस पाठपुरावा करून तालुका सिंचनाचा चाळीसगाव पॅटर्न निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button