?️ अमळनेर कट्टा..मास्क लावला नाही..!चला दंड भरा..!42 हजार दंड वसूल..
उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची कार्यवाही..
अमळनेर प्रतिनिधी– कोरोनाचा प्रादुर्भाव येत्या काही दिवसांत पुन्हा वाढला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पुन्हा नियम लागू केले असून मा.जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शहरातील विना मास्क फिरणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे.
शहरात विनाकारण फिरणा-यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. दुचाकीस्वार व चारचाकी वाहनांवर विना परवाना , माॅस्क न लावता फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आज शहरात ९० नागरिकांकडून २१,१००/- तर अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथून २१०००/- असे एकूण ४२ हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनापरवाना बिना मास्क असलेले नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली.मास्क न लावता 50 पेक्षा जास्त वऱ्हाडी घेऊन जाणारा आयसर चालका वर कार्यवाही केली.
सदर पथकाने मा. मा. उपविभागीय पोलिस अधिकारी अमळनेर श्री. राकेश जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अंबादास मोरे व त्यांचे पथक, सपोनि राकेशसिंग परदेशी ,पो कॉ बागुल दादा ,पो कॉ विजय पाटील,व होमगार्ड इतर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी केली.






