Pandharpur

शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला ताई गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाचे पंढरीत उद्घाटन…

शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला ताई गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाचे पंढरीत उद्घाटन…

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार कै. भारत भालके यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक होणार आहे. याबाबत सर्वच राजकीय पक्ष चाचपणी करत असून जाहीरपणे कोणी काहीही बोलण्यास तयार नाही. यातच आता शिवसेनेकडून गेले अनेक वर्षे या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करणाऱ्या शैला गोडसे यांनी आपले संपर्क कार्यालय रविवारी पंढरपूरमध्ये सुरू केले असून याचे उद्घाटन जिल्हा समन्वय प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.शिवसेना व भाजपाच्या युती असताना पंढरपूरची जागा शिवसेनेकडे होती मात्र 2019 ला चर्चा करून सदरची जागा भाजपाला देण्यात आली होती. कारण त्यावेळी ज्येष्ठ नेते स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी भाजपाच्या तिकिटावर ही जागा लढण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकीत या जागेवर भारत भालके हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले होते. आता त्यांचे निधन झाल्याने आमदारकीची जागा रिक्त आहे. येथे लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय हे घटक पक्ष आहेत. कै. भालके हे राष्ट्रवादीचे होते त्यामुळे सहाजिकच या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असणार हे निश्‍चितच आहे. यामुळे भालके यांच्या घरात राष्ट्रवादीने उमेदवारी मिळेल व महाविकास आघाडीचे घटकपक्ष दिलेल्या उमेदवाराला विजयी करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान आता शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी पंढरपूरमध्ये रविवारी 10 जानेवारी रोजी आपले संपर्क कार्यालय सुरू केले आहे. गोडसे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांनी यासाठी मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात आपला जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढविला होता तसेच मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्‍नासह विविध विषयांवर आवाज उठविला होता. मात्र 2019 च्या विधानसभेला ही जागा भाजपाकडे गेल्याने त्यांना निवडणूक लढविता आली नाही. मात्र आता त्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.
माजी जिल्हाप्रमुख सार्इनाथ अभंगराव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, 2019 ला या मतदारसंघातून शैला गोडसे यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली होती मात्र युती झाल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यांच्यावर अन्याय झाला. ही जागा जरी राष्ट्रवादीची असली तरी निवडणूक लढवायची तयारी आपण ठेवली पाहिजे.यावेळी उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत , तालुका प्रमुख महावीर देशमुख, शहरप्रमुख रवींद्र मुळे, ग्राहक संरक्षण जिल्हाप्रमुख जयवंत माने, अरुण कोळी , महिला आघाडी शहर प्रमुख पूर्वा पांढरे, उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, विनय वनारे ,नाना सावंतराव, तानाजी मोरे, पंकज डांगे, सिध्देश्वर कोरे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button