India

Politics: काँग्रेस ला भगदाड..!गुलाम नबी आजाद नंतर 64 नेत्यांनी सोडली काँग्रेस..!

Politics: काँग्रेस ला भगदाड..!गुलाम नबी आजाद नंतर 64 नेत्यांनी सोडली काँग्रेस..!

काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याच्या धक्क्यातून सावरत असतानाच मंगळवारी पक्षाला आणखी एक हादरा बसला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह पक्षातील तब्बल ६४ नेत्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामध्ये ५० हून अधिक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नेत्यांनी संयुक्त राजीनामा पत्र सादर केले, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय गुलाम नबी आझाद यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. गांधी घराण्याशी असलेले जवळपास पाच दशकांचे ऋणानुबंद आझाद यांनी तोडले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर सडकून टीका केली होती. आझाद लवकरच जम्मू-काश्मीरमधून राष्ट्रीय पातळीवरील पक्ष सुरु करणार आहेत.

माजी मंत्री-आमदारांचा काँग्रेसला रामराम

जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री अब्दुल मजीद वाणी, मनोहर लाल शर्मा, घारू राम आणि माजी आमदार बलवान सिंग यांच्यासह अनेकांनी पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह राजीनामा जाहीर केला. आझाद यांच्या समर्थनार्थ आम्ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना संयुक्त राजीनामा पत्र सादर केले आहे, असे बलवान सिंग यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षातील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. पक्षात संघटनात्मक बदल व्हावेत यासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता. आझाद यांना राज्यसभेत पुन्हा संधी नाकारल्यानंतर ते नाराज असल्याचं बोललं जात होतं.

काँग्रेस पक्ष तुमच्या नेतृत्वात चांगलं काम करत होता. मात्र, दुर्दैवाने जेव्हा पक्षात राहुल गांधी यांची एन्ट्री झाली आणि २०१३ मध्ये तुम्ही त्यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले तेव्हा पक्षातील संवादच संपला, असं आझाद यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button