चला मतदान करूया,लोकशाहीला बळकट करूया..!
एरंडोल तहसीलदार अर्चना खेतमाळीस
यांचे नागरिकांना आवाहन
विक्की खोकरे
एरंडोल – येथील पंचायत समितीच्या सभागृहात मतदान जनजागृती अभियान राबविण्याबाबत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी सेविका व त्यांचे मदनीस यांना एरंडोल तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी एरंडोल गट विकास अधिकारी मंजुषा गायकवाड याचीही उपस्थिती लाभली
उपस्थित अंगणवाडी सेविकांना तहसिलदार अर्चना खतमाळीस यांनी बोलतांना सांगीतले की,तालुक्यातील मतदानाची परीस्थिती पाहता लक्षणीय घट जाणवत असल्याने एकूण मतदान हे फक्त ६०%च होत असल्याने आपण सर्वांनी एकञ येऊन जनमानसात मतदानाविषयी त्याचबरोबर आपल्या नैतिक हक्काविषयी जनजागृती करणे गरजेचे असून प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहीजे,मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क अाहे तसेच महीलांनी अवश्य मतदान करावे.
बरोबरच आपली कर्तव्ये व जबाबदार्यांप्रती प्रत्येकाने सदैव जागरूक राहणे गरजेचे असल्याने मतदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगीतले. यावेळी पर्यवेक्षिका सौ. सुनंदा महाजन,छाया सपकाळे, शैलजा शरद पाटील,भारती सुतार,विजया बडगुजर तसेच ईतर पर्यवेक्षिका यांनी परीश्रम घेतले






