Maharashtra

हतनुर धरणाचे 24 दरवाजे पूर्ण उघडले नदीपात्रात 52 हजार 995 व्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु

हतनुर धरणाचे 24 दरवाजे पूर्ण उघडले नदीपात्रात 52 हजार 995 व्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु

रजनीकांत पाटील

हतनूर धरणाचे 24 दरवाजे पूर्ण, वाघूर धरणाचे 8 दरवाजे 0.1 मीटरने, बहुळा धरणाचे 2 दरवाजे 0.1 मीटरने तर बोरी धरणाचे 3 दरवाजे 0.15 मीटरने उघडले.
जिल्ह्यातील 13 मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर या सहा प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा तर पाच प्रकल्पांमध्ये 65 टक्केच्यावर उपयुक्त साठा.
हतनूर धरणात 1.66 टीएमसी, गिरणा 8.35 टीएमसी, तर वाघूर धरणात 7.73 टीएमसी याप्रमाणे 17.74 टीएमसी इतका उपयुक्त साठा.
मध्यम प्रकल्पांमध्ये 154.96 दलघमी म्हणजेच 5.47 टीएमसी इतका उपयुक्त साठा
96 लघु प्रकल्पात 66.42 दलघमी म्हणजेच 2.35 टीएमसी इतका उपयुक्त साठा
जळगाव, (जिमाका) दि. 30 – जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत चांगल्या प्रकारे वाढ होत असून अनेक मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 17.74 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे चोवीस गेट पूर्ण उघडण्यात आले असून धरणातून आज 52 हजार 995 व्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 502.54 दलघमी म्हणजेच 17.74 टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 1.66 टीएमसी, गिरणा 8.35 टीएमसी, तर वाघूर धरणात 7.73 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. वाघूर धरणाच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झाल्याने धरणाचे 8 दरवाजे 0.1 मीटरने उघडण्यात आले असून धरणातून 2534 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 154.96 दलघमी म्हणजेच 5.47 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. तर जिल्ह्यातील 96 लघु प्रकल्पात 66.42 दलघमी म्हणजेच 2.35 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर या सहा प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा तर मोर 65.21 टक्के, बहुळा 63.28 टक्के, गुळ 78.30 टक्के, बोरी 80.53 टक्के, मन्याड 64.20 टक्के उपयुक्त साठा आहे. तर अंजनी 37.54 टक्के व भोकरबारी धरणात 5.68 टक्के उपयुक्त साठा असून बहुळा धरणाचे 2 दरवाजे 0.1 मीटरने तर बोरी धरणाचे 3 दरवाजे 0.15 मीटरने उघडले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button