Faijpur

लोकसहभागातून लोकशाहीला बळकटी येईल – डॉ अविनाश ढाकणे

लोकसहभागातून लोकशाहीला बळकटी येईल – डॉ अविनाश ढाकणे

सलीम पिंजारी

भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रिया यशस्वीपणे राबवणारा देश आहे. अशा देशात निवडणूक आयोगाची 70 वर्ष पूर्ण होत असताना 2011 पासून अविरतपणे साजरा होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिवस उत्सवाचे हे दहावे वर्ष आहे. भारतीय राज्यघटने कुठलाही भेदभाव मान्य केला नसतांना ही समाजात लिंग असमानता दिसून येते. हा भेद संपवण्यासाठी प्रत्येकालाच कष्ट घ्यावे लागतील. मतदान प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यासाठी हरएक घटकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. मतदान आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराला सहजपणे मतदान करता यावे यासाठी विविध सुविधा पुरविल्या जातात.

त्यामुळे या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या औचित्याने सर्वांनी प्रतिज्ञा करूया आणि आपल्या या भारताच्या लोकशाहीला बळकटी आणूया असे आवाहन माननीय डॉक्टर अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी जळगाव यांनी व्यक्त केले.

फैजपूर येथील जे टी महाजन इंजीनियरिंग कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये राष्ट्रीय मतदार दिवसाच्या औचित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, डॉक्टर अविनाश ढाकणे
, कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर उदय टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय बोटे साहेब, माननीय तडवी साहेब, डीवायएसपी मा पिंगळे साहेब, महानगरपालिका आयुक्त, अजीत मुठे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर तुकाराम हुलवडे, परदेशी साहेब, धनाजी नाना महाविद्यालया चे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी या सोबत जळगाव जिल्ह्यातील प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अजित थोरबोले, प्रांताधिकारी फैजपूर यांनी केले. त्यात त्यांनी सांगितले की, तरूणाईच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे राष्ट्रीय मतदार दिवस. या दिवसाला फैजपुर उपविभागा साठी कार्यक्रमाला परवानगी दिल्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे व इतर सन्माननीय अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यासोबत सर्वांच्या सहकार्याने लोकशाहीला अधिक बळकटी आणण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाविषयी सकारात्मकता निर्माण करू असा विश्‍वास व्यक्त केला.

याप्रसंगी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्राध्यापक डॉक्टर पी पी पाटील यांनी निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून आपल्या भारतीय लोकशाहीला एक उज्वल परंपरा आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीतच असतात.मात्र मतदान जनजागृती साठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी ही पुढाकार घेऊन विकास प्रक्रियेला हातभार लावावा. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये अशी आर्त साद घातली. यावेळी रावेर व यावल तालुक्यातील नवमतदारांना मान्यवरांच्या हस्ते ईपीक कार्डांचे वाटप करण्यात आले. या सोबत मतदान प्रक्रियेला यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या अंगणवाडीसेविका, पोलीस पाटील, बी एल ओ, विविध शाळा, महाविद्यालय यांच्यासोबत विविध स्पर्धा आणि प्रशिक्षणे आयोजित करण्यात सहकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भारत देशाच्या रक्षणासाठी उमेदीची वर्ष दिलेल्या सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला. त्यात श्री युवराज गाढे, श्री भास्कर तायडे,श्री रवींद्र पाटील यांचा माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या शुभहस्ते सन्मान झाला. यासोबत विधानसभा व लोकसभा निवडणुका यशस्वी पणे राबिविल्याबद्दल जिल्हाधीकारी डॉ अविनाश ढाकणे याचा कुलगुरु प्रा पी पी पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचीच फोटो फ्रेम देऊन हृदयस्थ सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मा गोटे साहेब डॉक्टर उदय जी टेकाळे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार उषाराणी देवगुणे, तहसीलदार रावेर यांनी मांनले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले,तहसीलदार यावल माननीय जितेंद्र कुवर, तहसीलदार रावेर माननीय उषाराणी देवगुणे, सर्कल फैजपूर जे डी बंगाळे यांच्यासोबत प्रशासन व महसुलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक लेफ्टन राजेंद्र राजपूत व जे डी बंगाडे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button