?️ कोणी रस्ता देता का रस्ता चिखला पार या गावचा रस्ता कुठे लोकांना पावसाळ्यात शोधावी लागते वाट।
चिमूर प्रतिनिधी — ज्ञानेश्वर जुमनाके।
चिमूर— चिमूर तालुक्यातील एक छोटंसं गाव म्हणजे चिखला पार हे गट ग्रामपंचायत असून 45 ते 50 घराची वस्ती असणारे गावं 195 ते 200 इतकी लोकसंख्या या गावची आहे आज हे गाव चिखला पार नाल्या लगत वसलेलं आहे स्वातंत्र्य मिळवून येवडी वर्ष झाली परंतु या गावाला गावात जाण्यासाठी रस्ताच नाही येथिल लोक रस्त्याची वाट बघत आहे। चिमूर ते चिखला पार अंतर 7 किलोमीटर असेल चिमूर खरकाळा सावरगाव बॉय पास रस्त्यावर हे गाव वसले आहे परंतु आजही या गावात जायला रस्ता नाही सरकारच्या आदेशानुसार गाव तिथे शाळा आणि गाव तिथे रस्ता पण या गावात रस्ता नाही तर हे सरकरचे आदेश फक्त कागदोपत्री राहण्या करीता आहे काय असा प्रश्न आज या गाव वासीयांना पडला आहे।
भारत देश स्वतंत्र होण्या अगोदर पासन हे गाव वसलेलं आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळवून 74 वर्ष पूर्ण होत असताना चिखला पार वासीय जनता गावात रस्ता मिळाले काय या प्रतीक्षेत आहेत हे त्यांचे स्वप्न केव्हा पूर्ण होईल हे अजून गावातील लोकांनां कुणाला ही माहीत नाही —2019 मध्ये-26 आगस्ट ला खूप पाऊस चिमूर तालुक्या मुसळधार पाऊस होते आणि या गावाला सम्पूर्ण नाल्याच्या पुराणी वळले होते त्यावेळचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी बेहरे साहेब यांनी या लोकांन सोबत सम्पर्क करून 26 आगस्ट 2019 ला चिमूर येथील ट्रॅकटर नि आणून शेतकरी भवन येते ठेवले उपविभागीय अधिकारी बेहरे साहेब यांच्या सतर्कते मुळे त्या वेळच्या पुरा मध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही ही एक जमेची बाजू ठरली।
जेव्हा या गावातील लोकांना शेतकरी भवन मध्ये ठेवण्यात आले त्या वेळेला प्रत्येक पक्षाचे नेते कार्यकर्ते येऊन व्हावायकी मिळवण्यासाठी जेवणाची व्यवस्था करीत होते तर कुणी चहा नाश्त्या ची व्यवस्था करतांना दिसत होते समोर विधानसभा निवडणुका होत्या म्हणून की काय हे नेते कार्यकर्ते सेवा देत असतील त्यावेळेला नेत्यांनी आश्वासन सुद्धा दिले असतील पण ते आश्वासन आज 1वर्ष होत आहेत सांगायचे झाल्यास 11 महिने 3 दिवस उलटूनही चिखलेपार वासीयांना रस्ता मिळालेला नाही आहे हे तिथल्या लोकांचे दुरदेवच म्हणावे लागेल.
चिखलेपार हे गाव कळमगाव गट ग्रामपंचयत मध्ये येत असून येते 1 ते 4 पर्यत शाळा आहे पुढील शिक्षणासाठी सावरगाव किंवा चिमूर ला मुलांना यावं लागते आज शिक्षण नाला सरकार महत्व देत असून या गावातील मुलाचे शिक्षण पावसाळ्यात नाल्याला पूर आला तर शाळेला सुट्टी मारावी लागते येथील लोकांन चा तालुक्या पासुन पावसाळ्यात तुटत असते आज या गावातील लोकांना रस्त्याची अंत्यत आवश्यकता असून लोक प्रतिनिधीनि व प्रशाश्नांनी लक्ष देणे गरजेचे आहे —— जेव्हा येथील सरपंच यांच्याशी दूरध्वनी द्धारे सम्पर्क करून विचारणा केले असता त्यांनी गावातील व्यथा सांगितली की मी या गावा करीत मागील 10 वर्षा पासून रस्त्याची मागणी करीत आहे उपसरपंच असताना व आता सरपंच आहे तेव्हा ही मागणी करीत आहे p w d ला पण 1 वर्षा अगोदर रस्त्या करिता निवेदन दिले आहे पण त्यांनी सांगितले की एकतर 500 मीटर चा पूल बनवावं लागेल त्याच नंतर रस्ता बनेल आताही आम्ही लोक नाल्याच्या बंदाऱ्या वरून गावात येतन जाण करीत आहोत पण जर नाल्याला पूर आला तर आम्हाला जाण्यासाठी कुठला ही मार्ग नाही आणि या पुरामुळे पूर्ण पाणी गावात घुसत असते जर गावात पुराच्या वेळी बिमार राहिले तर त्याला दवाखान्यात सुध्दा उपचारा करीता नेता येत नाही अशी बिकट परिस्थिती पावसाळ्यात होत असते आमची येवळीच विनंती लोकप्रतिनिधी व प्रशासनाला आहे की आमच्या गावाला रस्ता द्यावं।
सरपंच – संतोष डांगे चिखलेपार ।।। महात्मा गांधी यांनी म्हटलं होतंय की खेड्या कळे चला खेड्या कडे पण या चिखलेपार ला जायला रस्ताच नाही तर जायचे कसे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.






