पेठ

कोशिंबेजवळ दुचाकीचा अपघात; तीन शेतमजूर ठार

कोशिंबेजवळ दुचाकीचा अपघात; तीन शेतमजूर ठार

विजय कानडे

दिंडाेरी । तालुक्यातील काेशिंबे परिसरात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून दुचाकी खड्ड्यात गेल्याने मतदान करून परतीच्या प्रवासात असलेले तीन शेतमजूर जागीच ठार झाले. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे कामानिमित्त असलेले तीन शेतमजूर त्यांच्या मूळगावी दुमीपाडा (ता. सुरगाणा) येथे मतदानासाठी गेले होते. मतदान करून परतीच्या प्रवासात असताना सायंकाळच्या सुमारास कोशिंबे गावाजवळ दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात कोसळली. यात यादव मुरलीधर जाधव (२७), रामदास बन्सी पवार (२७) व भोलेनाथ जिवला कडाळे (१८, तिघे रा. दुमीपाडा) हे जागीच ठार झाले.

या तिघांना परिसरातील नागरिकांनी वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत वणी पाेलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button