Ausa

वैष्णवीच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा संतुजी ब्रिगेड औसाची मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्र्याकडे मागणी

वैष्णवीच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा
संतुजी ब्रिगेड औसाची मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्र्याकडे मागणी

लातुर औसा प्रतिनिधी :- प्रशांत नेटके

बुलढाणा जिल्हयातील मलकापूर येथे राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय खाटीक कुटुंबातील अल्पवयीन विद्यार्थीनी वैष्णवी चे काही समाज कंटकांनी अपहरण करून, अमानुषपणे अत्याचार करून, क्रूरपणे हत्या केली आहे वैष्णवीचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत बऱ्हाणपूर जवळील जंगलपरिसरात सापडला आहे. अशा घटना मानव जातीला काळीमा फासणाऱ्या व कलंकित करणाऱ्या आहेत ह्रदयाला हेलावून टाकणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत चाल्या आहेत.
मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंध कायदा, भा. द. वी ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करावा, संपूर्ण प्रकरणाची सी. बी. आय चौकशी करावी, पिडीत कुटुंबियास शासकीय मदत करण्यात यावी यासाठी
अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड औसा तालुका यांच्या वतीने
मागण्यांचे निवेदन तहसीलदार औसा यांच्या मार्फत महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले असून या निवेदनाच्या प्रति सामाजिक न्यायमंत्री, ग्रहमंत्री व जिल्हाधिकारी लातूर यांच्या नावे पाठवण्यात आल्या असून या निवेदनावर विलास नामदेव तपासे,दिपक चाबुकस्वार, उमाकांत कांबळे, हिराचंद बेद्रे,ओमकार बेद्रे, राजीव कसबे आदीच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button