ChalisgaonMaharashtra

? दहशतवादी हल्ल्यात चाळीसगांव येथील 20 वर्षीय जवान शहीद…शनिवारी पार्थिव जळगावात..!

? दहशतवादी हल्ल्यात चाळीसगांव येथील 20 वर्षीय जवान शहीद…

जम्मूकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दि. २६ नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. श्रीनगरच्या बाहेर असलेल्या परिम्पुराच्या खुशीपुरात दहशतवाद्यांनी दलाच्या जवानांवर हल्ला केला. यामध्ये दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील 20 वर्षीय यश दिगंबर देशमुख सह उत्तर प्रदेशातील आणखी एका जवानाला वीरमरण आले आहे.

गेल्या संपूर्ण महिन्याभरात अनेक वेळा दहशतवादयांनी अनेक हल्ले सीमेवर केले आहेत.त्यामुळे सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडता यावी यासाठी पाकिस्तानी सैन्यानं चालू वर्षात आतापर्यंत ४ हजार १३७ पेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

दरम्यान शहिद झालेला जवान यश देशमुख हा मराठा रेजिमेंट १०१ बटालियनचा जवान असून श्रीनगर येथे सुरक्षेसाठी विविध पॉइंटवर जवान तैनात केले होते. त्यातिल २ पॉइंटवर यश देशमुख आणि उत्तरप्रदेशचा जवान ज्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. तेथे अचानक तीन दहशतवादी आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत यश आणि सोबतच्या जवानाला गंभीर जखमी केले. यात दोघंही जवानांना वीर मरण आले.

चाळीसगावचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी माहिती दिली आहे की यश चे पार्थिव शनिवारी २८ रोजी जळगाव जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे.

यशच्या परिवारात आई – वडील, एक भाऊ, दोन बहिणी यांचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर त्याची यावर्षी सैन्य दलात निवड झाली
होती. सुमारे चार महिन्यापूर्वीच त्याला नियुक्ती मिळून श्रीनगर येथे त्याला ड्युटी देण्यात आली होती. त्याला वीरमरण आल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

एका बाजूला आज 26 /11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आज देशभरात आदरांजली देण्यात येत आहे. आणि आजच दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button