Maharashtra

निंबध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनच्या कल्पना शक्तीचा विकास-

निंबध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीचा विकास-
विलासराव पाटील
देवगांव देवळी हायस्कुलमध्ये बक्षीसवितरण व वृक्षारोपण

निंबध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनच्या कल्पना शक्तीचा विकास-

अमळनेर प्रतिनिधी- विद्यार्थिनी शाळेत शिकत असताना डोळ्यासमोर एक उद्दिष्ट ठेवले पाहीजे त्यासाठी भरपूर मेहनत , स्वतःमध्ये आत्मविश्वास राहिला तर त्याची पावलं स्वप्नपूर्ती कडे जातात असे देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये बक्षीस वितरण वृक्षारोपण प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.

निंबध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनच्या कल्पना शक्तीचा विकास-
  ते पुढे म्हणाले की आज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. माजी पंतप्रधान राजीव गांधी 21 शतकातील भारत कसा असेल यासाठी आपल्या देशातील मागासलेपणा दूर करायची असेल तर माहिती तंत्रज्ञानाची गरज आहे आपल्या देशातील युवकांना मतदानाचा अधिकार 18 वर्षे केले देशातील सर्वात मोठी ताकद तरुण वर्ग आहे हे त्यांनी ओळखले होते. 
व आपल्या  संस्थेचे अध्यक्ष  कै. एस एल पाटील यांचा जन्मदिवस साजरा करताना विविध उपक्रमांची आज आयोजन करण्यात आले होते निबंध स्पर्धेत मला काय व्हावेसे वाटते या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले मनातील भविष्यातील इच्छा व्यक्त करून अत्यंत चांगल्या पद्धतीने निबंध लिहून यश मिळवले व त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले पुढेही विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न पुर्तीसाठी भरपूर मेहनत करून शाळेचे नाव व गावाचे नाव उज्वल करावे 
असे विलासराव पाटील म्हणाले.
 व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन शाळेचे लिपिक एन.जी देशमुख होते. अगोदर कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी व संस्थेचे अध्यक्ष कै.एस.एल.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले.
 माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस व संस्थेचे अध्यक्ष एस एल पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेत निबंध स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली होती .शाळेचे शंभर  त्यांनी भाग घेतला,त्यातील दहा विद्यार्थ्यांना बक्षीस अध्यक्षांच्या हस्ते देण्यात आली व त्यांच्या असते शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. इयत्ता आठवीचे विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती विभाग प्रमुख आय आर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन स्काउट शिक्षक एस के महाजन यांनी केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button