Amalner

जागो न प  प्यारे…स्मारकांची दुरावस्था.. न प ची अनास्था…छत्रपती च नव्हे तर इतर स्मारके देखील स्वच्छतेच्या प्रतीक्षेत..

जागो न प प्यारे…स्मारकांची दुरावस्था.. न प ची अनास्था…छत्रपती च नव्हे तर इतर स्मारके देखील स्वच्छतेच्या प्रतीक्षेत..

अमळनेर शहरात अनेक श्रेष्ठ जेष्ठ क्रांतिकारक, महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.अमळनेर शहर स्मारकांचे शहर म्हणून ओळखले जाते. यात अगदी जुन्या सुभाष चौकात स्थित सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्या पासून ते राणी लक्ष्मीबाई पुतळा आणि आता नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत स्मारके अस्तित्वात आहेत. स्मारके बांधली तर जातात पण त्यांची स्वच्छता आणि टापटीप मात्र केली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ तर प्रचंड प्रमाणात घाण असते पुतळा धुतला जात नाही. आता सर्वत्र गवत झाले असून महाराजांच्या पुतळ्या भोवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तरुण वर्गाने ह्या कडे लक्ष वेधले असून सर्वच स्मारकांच्या भोवती असलेली घाण,अस्वच्छता दूर करणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.न प ने फक्त पुतळे न बांधता त्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. तुषार सोनार ह्या सुशिक्षित युवा च्या ही गोष्ट लक्षात आली आणि सोशल मिडिया वर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील फोटो व्हायरल करत स्वच्छतेची मागणी केली आहे. त्याने आपल्या पोस्ट मध्ये नेत्यांनी डोळे उघडावेत अशी झणझणीत अंजन घालणारी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे लवकरच सर्वच स्मारकांजवळील साफ सफाई केली जाईल अशी आशा बाळगू यात…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button