?️अमळनेर कट्टा.. पाडळसरे Live.. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा दौरा..खोदा पहाड निकला चुहां..!पहाणी पेक्षा कार्यकर्ता मेळाव्याला अधिक महत्व..!
अमळनेर येथे आज सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी वाजेपर्यंत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा पाडळसरे धरण पाहणी दौरा संपन्न होत आहे. या दौऱ्या दरम्यान पाडळसरे येथे जलसंपदा मंत्री यांचे आगमन 2 वाजून 5 मिनिटांनी झाले.त्यांनी अवघ्या 50 मिनिटांत हा पाहणी दौरा आटोपला. यात पाडळसरे धरण अधिकारी यांची बैठक,धरणाची प्रत्यक्ष पाहणी तसेच उपस्थित कार्यकर्ते,धरण समितीच्या लोकांची भेट,भाषण बाजी इ संपुर्ण कार्यक्रम अवघ्या 50 मिनिटात आटोपते घेत पाहणी दौरा पूर्ण करून ठीक 3 वाजून 30 मिनिटांनी अमळनेर कडे रवाना झाले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तीचा अभाव आढळून आला. मराठवाड्या कडे जास्त लक्ष दिले जाते आणि खान्देशला नेहमीच दुर्लक्षित केलं जातं या प्रश्नाचं उत्तर माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जल संपदा मंत्री जयंत पाटील या दोघांना ही देता आले नाही. आपल्या धरणासाठी भाषणात कोणतेही ठोस आकडा पाडळसरे येथे जाहीर करण्यात3आला नाही. तसेच कोणततेही ठोस असे आश्वासन ही यावेळी ते देऊ शकले नाहीत. कदाचित नाट्यगृह येथील कार्यकर्ता मेळावा येथे काहीतरी ठोस आश्वासन मिळण्याची शक्यता आहे. कारण कार्यकर्ते समोर आले की मंत्र्यांना बरेच बळ प्राप्त होते.पाहू या नाट्यगृह येथील मेळाव्यात आपल्या भाषणातून काय निष्कर्ष निघतो ते..!
मात्र एकनाथराव खडसे यांनी प्रतीक्षा कालावधीत पत्रकारांशी संवाद साधला. यात भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन हे गेल्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते मात्र तरीही त्यांनी जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कडे दुर्लक्ष केले त्यामुळेच अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्प रखडला असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील प्रकल्पाची पाहणी करणार आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे प्रकल्पाच्या ठिकाणी उपस्थित आहेत या प्रसंगी ते बोलत होते
१९९९ ला गोपीनाथ मुंडे आणि मी पाडळसरे धरणाचे भूमिपूजन करून प्रत्यक्षात धरणाच्या कामाला सुरुवात केली होती. त्या नंतर गेले २१ वर्ष चा कालावधी झाला हे धरण अजून अपूर्ण आहे.
हे धरण पूर्ण व्हावे म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले मात्र काही तांत्रिक अडचणी आल्या. दुर्दैव असे की मागच्या सरकार मध्ये जळगाव जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री असतांनाही या धरणाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले . असे गिरीश महाजन यांचे नाव न घेता एकनाथ खडसे यांनी टीका केली असून मी दोन वर्षांचा कालावधी मध्ये पाटबंधारे मंत्री होतो त्यावेळी अनेक धरणाचे कामाला सुरुवात झाली असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.
आपण भाजपा मध्ये असताना हे धरणाचे काम सुरू झाले मात्र अजूनही धरण पूर्ण झाले नाही यावर बोलतांना एकनाथ खडसे यांनी झाला गेले विसरून नव्याने सुरुवात केली आहे . भाजप मध्ये मी ४० वर्ष होतो म्हणून या धरण्याच्या कामाला सुरुवात झाली. १९९७ ला या धरणाविषयी नागरिकांनी माझाकडे हे धरण झाला पाहिजे अशी मागणी केली होती. त्यावर मी नागरिकांना एक अट घातली होती की तुम्ही माझा जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला तर मी तुमचा धरणाच्या कामाला कोणत्याही परिस्थितीत सुरुवात करेल . तसेच मी या परिसरातील नागरिकांना शब्द दिला होता की जर हे धरण मजूर झाला नाही तर आयुष्यात तुम्ही भाजपा ला एकही मत देवू नका. आणि मी आपणास तोंड ही दाखवणार नाही. आणि आनंद या गोष्टीचा आहे की जेंव्हा मी पाटबंधारे मंत्री होतो तेंव्हा या धरणाला मंजुरी मिळाली हे धरण पूर्ण झाल्यास मला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारादरम्यान अमळनेर मतदार संघात राष्ट्रवादी चा आमदार निवडून दिल्यास हे पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते . अमळनेर मधून राष्ट्रवादी चे आमदार निवडून देखील आले आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी त्यासाठीच जयंत पाटील यांचा दौरा आहे. की दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे आणि या कामाला वेग आणण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र बैठक घेतली आहे. काही तांत्रिक बाबी वर अडचणी आहेत त्या दुरकरून टेक्निकल बाबी क्लिअर झाल्या तर तीन चार महिन्यात कामाला सुरुवात होईल . व बऱ्या पैकी निधी देखील उपलब्ध होईल असे एकनाथ खडसे म्हणाले.
राज्यपालांना विमान नाकारल्या वरून गदारोळ सुरू आहे यावर एकनाथ खडसे यांनी बोलणे मात्र त्यांनी टाळले.






