इंदापुर मध्ये वंचित बहुजन आघडीच्या वतीने डफली आंदोलन पार पडले
पुणे जिल्हा प्रतिनिधी
दत्ता पारेकर
पुणे: केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येतोय. इंदापूर मध्येही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासकीय भवनासमोर हलगी वाजवून आंदोलन केले. ये सरकार झुटी है, देश कि जनता भुकी है, एस टी सेवा सुरु झालीच पाहीजे, वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो, लाॅकडाऊन रद्द झाला पाहीजे अशी विविध प्रकारची घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली.
राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याच अनुषंगाने इंदापूर प्रशासकीय भवनासमोर कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले.
याबाबतचे लेखी निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असून यात म्हटले आहे कि, 25 मार्चपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाय योजना करण्यात आल्या. 1) सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली.2) ऑफिस, दुकाने, हॉटेल, मार्केट इत्यादि ज्यामुळे लोकांचा आपापसांतील संपर्क कमी होईल अशा प्रकारे सर्व व्यवहारांवर निबंध घालण्यात आले.या चार महीन्यातील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार व एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.कोरोना विरुध्द लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे 80 % लोकांनी दाखवली आहे. 15 % लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन करोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. 5 % लोक vulnerable आहेत. हे अद्ययावत वैद्यकीय उपचार देऊनही ही नियंत्रणात आणता येत नाहीत. वैद्यकीय दृष्ट्या गंभीर होत आहेत व बळी पडत आहेत.

सरकारने या 15 % + 5 % = 20% लोकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्न केंद्रित केले पाहिजेत व कोरोना नियंत्रणाच्या नियोजनाचे है सूत्र ठेवले पाहिजे.100% लोकसंख्येवर निबंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत. अर्थव्यवस्था संकटात आहे. 80% पेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या चार महिन्यांचा आढावा घेऊन सरकार काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत.अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी अगोदर केलेली आहे.कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम आहेत त्याचे काटकोर पालन करत सर्व व्यवहा चालू करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.
एसटी, बेस्ट तसेच सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरु कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. गणपती उत्सवासाठी खाजगी बस वाहतूकीचे बुकींग सुरुवात झाले आहे. खाजगी सेवा चालू होत असतील तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे ? सरकारने एसटी व बेस्टच्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेत परंतु त्या फारच अपुऱ्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची अतिशय गैरसोय होत आहे. दुसरे म्हणजे सध्या घातलेली जिल्हा बंदीही ताबडतोब उठवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी केली आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण, दत्तात्रय घोडके,सागर लोंढे,हनुमंत नारायण बनसुडे,प्रमोद चव्हाण,सुरज भोसले,पवन पवार,सागर गायकवाड,भाऊसाहेब साबळे यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.






