28 मार्च रोजी नगरपंचायत च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दोन तासाचा होलसेल भाजीपाला बाजार संपन्न
लोणंद दिनांक 28 दिलीप वाघमारे
नगरपंचायत लोणंद यांच्यावतीने अठ्ठावीस मार्च 2020 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सहा ते आठ या वेळेमध्ये होलसेल भाजीपाला व्यापार भरल्यामुळे झोपडपट्टी पासून मध्यमवर्ग या पर्यंत भाजीपाल्या मुळे गोरगरीब जनतेचा चुली पेटल्या सध्या जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाने संचारबंदी असताना नागरिक रस्त्यावर येऊ शकत नव्हते परंतु आजच्या बाजार भाव मुळे लोकांची गैरसोय झाली नाही परंतु नगरपंचायत तर्फे दोन तासाची वेळेपेक्षा किमान पाच सहा तासाची वेळ जाहीर करावी अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने अनेकांनी व्यक्त केली नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांनी पहिल्यांदा गोटे माळ येथे बाजार भरणार असे कळवले होते आणि काही तासानंतर पुन्हा मार्केट कमिटीच्या आवारात बाजार भरला जाईल यादुपती भूमिकेमुळे शेतकरी ग्राहक वर्ग हे कोंडीत सापडले होते तरी यापुढे नगरपंचायतीने दवंडी मार्फतच नागरी सुविधा जाहीर कराव्यात कारण जवळपास तालुक्यातून शेतकरी वर्ग बंद असल्यामुळे वडाप बंद आहे ज्याच्याकडे वाहने आहेत ज्याच्याकडे टू व्हिलर गाड्या आहेत अशी लोक या बाजारात येत असतात ज्या लोकांच्या कडन इतर वाहने नाहीत अशी काही कुटुंबे वाहनांची वाट बघेपर्यंत दोन तास लुटून जातात त्यामुळे शेतीमालाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते यासाठी नगरपंचायत नि वेळ वाढवून दिली पाहिजे तरच शेतीमाल बाजारातून विकला जाऊ शकेल व शेतातून बाजारात येईल अशी वेळ अमलात आणणे जरुरी आहे अशी मागणी खेड बुद्रुक येतील धायगुडे सरपंच यांनी केली आहे.