Pandharpur

विठ्ठल साखर कारखान्याचे ऊस बील वाटप होणार सुरू GST ने खाती केली सुरू

विठ्ठल साखर कारखान्याचे ऊस बील वाटप होणार सुरू GST ने खाती केली सुरू

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या च्या सभासदांनी भुलथापांवर विश्वास ठेवू नये– चेअरमन भगिरथ भालके यांचे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये काही मंडळी गैरसमज पसरवित आहेत. याचबरोबर सोशल मिडीयावर अफवा पसरवण्यात येत असुन विठ्ठलच्या सभासदांची सर्व ऊस बिले देण्यास कारखाना प्रशासन सक्षम आहे. लवकरच ऊस बिले वाटप सुरु करण्यात येणार आहेत. जीएसटी विभागाने सील केलेली सर्व बॅक खाती शुक्रवारी सुरु झालेने “विठ्ठल” च्या सभासदांनी भुलथापांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन चेअरमन भगिरथ भालके यांनी केले आहे.पुढे बोलताना चेअरमन भगिरथ भालके म्हणाले की, सन २०१९ – २०२० गाळप हंगामामध्ये कारखाना सुरु झाला नाही. यामुळे सन २०१८ – २०१९ ची जीएसटीची रक्कम‌ थकबाकी राहिली आहे. यावर्षीचा गाळप हंगाम सुरु करताना कै आ. भारत नाना भालके व संचालक मंडळानी वेळोवेळी पुणे येथील जीएसटी कार्यालयात जावून ५ कोटी ८२ लाख भरले आहेत. उर्वरीत रक्कम भरणेसाठी‌ मुदत घेतली आहे. यावर्षी गाळप हंगामातील सर्व जीएसटी रक्कम कारखान्याने भरली असुन मागील थकीत रक्कमेपैकी ८ कोटी ५० लाख भरले आहेत. चेअरमन भगिरथ भालके व संचालक मंडळाने जीएसटी सह आयुक्त यांची भेट घेवुन थकित रक्कमेबाबतची तपशिलवार माहिती दिली. यामुळे शुक्रवारी सील‌ केलेली सर्व बॅल खाती सुरु करण्यात आली आहेत. कै भारत नाना भालके यांच्या धोरणानुसार कारखान्याचे कामकाज संचालक मंडळ करीत आहे. मागील कोणतीही ऊसबिले थकीत नाहीत. यावर्षीच्या गाळप हंगामातील एफआरपी प्रमाणे ऊस बिलांचे लवकरच वाटप सुरु करणार असल्याचे चेअरमन भगिरथ भालके यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button