Pandharpur

श्रीकांत शिंदे यांचा परिचारक गटांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न—-

श्रीकांत शिंदे यांचा परिचारक गटांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न—-

प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपुरात कालपासून सोशल मीडियावर आमदार भारत नाना भालके यांच्यावर मिस्त्री येथे बाबत ज्या कार्यकर्त्यांनी पोस्ट केल्या त्या कार्यकर्त्यांना निष्क्रियतेचा या शब्दाचा अर्थ तरी माहीत असेल का याचा विचार करावा लागत आहे
माझा नेता अजितदादा यावर काय बोलतो माहित आहे का जो काम करत असतो तोच चुकत असतो. जो कामच करत नाही त्याच्या कडून काही चुकीचे घडेल याची अपेक्षा च धरू नका . हे कदाचित आपल्या नेत्याला सुद्धा माहीत आहे कोणाच्या काळात पुणे मुंबई या भागात आपल्या पंढरपूर शहरातील व तालुक्यातील 350 मुलांचे पास काढून त्यांना आपापल्या घरी सुखरूप पोचले का हे काम निष्क्रिय आहे का ? हो सोमनाथ मोरे .राहणार गणेशवाडी, तालुका मंगळवेढा. ही व्यक्ती आपल्या पत्नीची डिलिव्हरी करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले असता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या ताईला पंढरपूरला किंवा सोलापूरला घेऊन जा असे सांगितले असताना.

आपल्या पत्नीला होणारा त्रास पाहून त्या व्यक्तीला काय करावे असे सुचत नसताना ही. अडचणीच्या काळात आमदार भारत नाना भालके आपल्या मदतीला धावतील. हा विश्वास वाटला म्हणून त्या व्यक्तीने रात्रीचा आठ वाजता कॉल केला. आणि घडलेला प्रकार आमदार भारत नाना सांगितला.त्याचवेळी भारत नानांनी कोणताही विचार न करता. त्या मोरे ना म्हणाले की त्या अधिकारी यांना फोन द्या, म्हणाले आणि त्या वैद्यकीय अधिकार्‍याला सूचना केली की त्या मोरेंना सहकार्य करा.त्यांना कोरोना च्या काळात पंढरपूर, सोलापूर इकडे जाण्याची वेळ येऊ देऊ नका . याचाच दुसरा भाग म्हणजे सकाळी सात वाजता सोमनाथ मोरे नी आमदार साहेबांचे आभार मानण्यासाठी एक भावनिक मेतेज टाईप करून पाठवला. आमदार साहेब मला कन्यारत्न झाले, मग मित्रांनो सांगा ज्या व्यक्तीला आमदार भारतनाना भालके कधी भेटले नाहीत, ती व्यक्ती माझा कार्यकर्ता आहे का ? नाही त्याने मला मतदान दिले आहे का ?नाही तो माझ्या पार्टीचा आहे का ? नाही या गोष्टीचा कोणताही विचार डोक्यात न आणता केवळ माझ्या मतदारसंघातील आहे. आणि त्याला अडचणीच्या काळात त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून त्याला मदत करणे माझं कर्तव्य आहे. म्हणून आमदार साहेबांनी केलेली मदत ती निष्क्रियतेची लक्षण आहे का?हो मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी , राहाटेवाडी, येथील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून ची असलेली पाण्याची होत असताना त्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करत असताना आपले सरकार आल्यानंतर आज मात्र आमदार भारत नाना भालके यांच्या प्रयत्नातून त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात 16 किलोमीटर अंतर हुन 2 हजार हेक्‍टर क्षेत्र भिजेल एवढे पाणी देण्याचे काम आमदार भारत नाना भालके यांच्या प्रयत्न मधून झाले मग सांगा शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याची भूमिका घेतलेली भूमिका यातून खरंच आमदार साहेब निष्क्रिय आहेत का? हो
मित्रांनो करण्याचे संकट देशावर आणि महाराष्ट्र राज्य वर असताना खरं तर कोणीच राजकारण करायला नको होते, पण पंढरपूर शहरात मात्र जाणीवपूर्वक राजकारण घडत असताना दिसत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून आमदार भारत नाना भालके यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने नगरपालिका,प्रांत अधिकारी, तहसीलदार पोलीस प्रशासन यांना एकत्र घेऊन विचार विनिमय होणे गरजेचे असताना,केवळ विरोधी पक्षाचे आमदार म्हणून त्यांचा जाणीवपूर्वक अवमान नगरपालिका चे मुख्याधिकारी साहेब यांच्या कडे आपत्ती व्यवस्थापन चा कार्यभार असताना त्यांनी केलेले दिसले.ज्या जनतेने नानांना भरभरून मते दिले खऱ्या अर्थाने त्या जनतेचा अवमान मुख्याधिकारी साहेब तर करत नाहीत ना ?असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न कदाचित सर्वांच्याच मनात असेल.आपत्ती व्यवस्थापन चे सर्व अधिकार मुख्याधिकारी यांना असताना सर्व राजकीय, सामाजिक संघटना यांना एकत्र घेऊन निर्णय घ्यायचे असताना,मात्र इथे फक्त राजकीय रंग देऊन मी किती कामाचा हे दाखवण्याचा प्रयत्न नगरपालिका च्या माध्यमातून काही नेते मंडळी दाखवत तर नाहीत ना ? त्या उलट त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून नाना निष्क्रिय आमदार म्हणून उपाधी देत आहेत
नाना खरंच जर निष्क्रिय असते तर पंढरपूर मंगळवेढा जनतेचे जनतेने आमदार भारत नाना भालके यांना तीन टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली असते का ? मग मित्रांनो सांगा खरच नाना निष्क्रिय आहेत का ?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button