मनसेच्या ‘खळफटयाक’च्या भीतीने बचत गट वसुलीसाठी लागला ब्रेक
महिलांना अडचणीच्या काळात दिलीप धोत्रे यांच्यामुळे मिळाली अजून सवलत
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर मागील सहा ते सात महिन्यांपासून धोरणामुळे सर्व ठिकाणचे व्यवसाय ठप्प झाले होते. यामुळे विविध बँकाआणि महिला बचत गटांचे कर्जाचे हप्ते थकीत झाले होते.सध्या अजूनही अनेक व्यवसाय सुरू नसल्याने अजूनही काही महिने ही वसुली थांबवावी अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे.बचत गटाची रक्कम मिळताना विमा रक्कम म्हणून काही पैसे काढून घेतले जातात ,त्यामुळे या कोरोनाच्या वाईट परिस्थितीत तो विमा लागू करून महिलांचे कर्ज जमा करून त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देऊन ही महिला बचत गटाची चळवळ सुरू ठेवावी अशी मागणी मनसेने लावून धरली आहे याबाबत मनसेचे दिलीप धोत्रे यांनी मागील चार महिन्यापासून अडचणीत आलेल्या या बचत गटाच्या महिलाना सवलत देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे, त्यामुळे अनेक महिला बचत गटांच्या महिलानी आभार मानले आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेची ओळख सर्वाना जुनीच आहे. एखाद्या विषयावर जर मनसेने लक्ष घातले तर तो विषय निकालात काढण्यात या मनसेने आजवर काम केले आहे. त्यामुळे हा विषय दिलीप धोत्रे यांनी आता सम्पूर्ण राज्यातील महिलांना दिलासादायक असल्याने थेट हेबचत गट वसुली बाबतीत होणारा महिलांना जो त्रास आहे तो राज ठाकरे यांच्या पर्यंत पोहचविले आहे. त्यामुळे लवकरच राज ठाकरे याबाबत निर्णय घेऊन याबाबतीत आवाज उठवून महिलांना दिलासा मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.






