Maharashtra

महसूल वसुलीचे 100 टक्के उद्दीष्ट पुर्ण जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

प्रतिनिधी फहिम शेख

महसूल वसुलीचे 100 टक्के उद्दीष्ट पुर्ण
जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

नंदुरबार दि.31- जिल्ह्याने महसूल वसुलीचे 100 टक्के उद्दीष्ट पुर्ण केले आहे. 40 कोटींचे उद्दीष्ट असताना 41 कोटी 16 लक्ष रुपयांची वसुली करण्यात महसूल यंत्रणेला यश मिळाले आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सर्व कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

जिल्ह्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका, नैसर्गिक आपत्ती, कोविड-19 आजाराचे संकट आदीच्या पार्श्वभूमीवर चांगली कामगिरी केली आहे. एकूण उद्दीष्टाच्या 108 टक्के वसुली करण्यात आली आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही कामगिरी शक्य झाली असून येत्या काळातही जिल्ह्याची सर्व क्षेत्रात कामगिरी उंचावेल, असा विश्वास डॉ.भारुड यांनी व्यक्त केला आहे.

—-

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button