वाघाच्या हल्ल्यात बाम्हणगाव येथील शेतकरी ठार
ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर/.तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लागत असलेल्या सातारा शेतशिवारातील जंगलामध्ये लागून असलेल्या आपल्या शेतीची मध्ये काम शेतीचे कामे करित असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने सायंकाळी ५.३० अचानक पण केलेल्या हल्ल्यात राज्यपाल दयाराम नागोसे वय ४० वर्षे रा बाम्हणगांव येथील शेतकरी जागीच ठार झाली आहे,या पूर्वी याच परिसरातील ही पाचवी घटना आहे,गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावर असतात. या पूर्वी कोलारा येथील शेतकरी व महिलेला,व सातारा येथील महिलेला वाघाणे ठार मारले होते त्या मुळे परिसरातील जनता वाघाच्या दहशत मध्ये वावरताना दिसत आहे,शवविच्छेदन करण्याकरिता मृत्यदेह चिमूर उपजिल्हा रुगणल्यात नेण्यात आला आहे,शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी ,कोडापे वनपाल,वनरक्षक वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.






