?Big Breaking…राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा..!जळगांव सह अमळनेर येथे अवकाळी वादळी पाऊस..!
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठे नुकसान केले आहे. राज्याच्या विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला तर काही परिसरात गारांचा खच पडल्याचे दिसून आले.
यामध्ये अहमदनगर, जळगाव, बीड, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारांचा तडाखा बसला आहे.जळगांव जिल्ह्यासह अमळनेर येथे देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. मारवड परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे.कळमसरे येथे वादळी पाऊस तर बहादरपूर येथे गारपीट झाली आहे.संबधित गावांमध्ये किती नुकसान झाले याची सध्या तरी माहिती उपलब्ध नाही.
गारपिटीने आंबा, कांदा, गहू ,हरबरा, मका भुईमुग व उसाचे नुकसान झाले.दोन दिवसापासून वातावरणात बदल झाले असून, ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.