उत्तरप्रदेश, औरंगाबाद येथून लामजना उरूससाठी आलेल्या सर्कस, रहाट पाळणे कामगार व्यावसायिकांसाठी लॉक डाऊन काळात लामजना ग्रामस्थ सरसावले पुढे
प्रशासनाने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या -व्यावसायिक कामगारांची मागणी
औसा /लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-
औसा तालुक्यातील शेख सुलतान शेख अब्दुला दर्गा यात्रा महोत्सव दरवर्षी जुन्या लामजना गावात भरवला जातो. हा उरूस दिनांक १८ मार्च -२२मार्च या कालावधीत भरवण्यात येणार होता मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने यात्रा महोत्सव गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले होते. या यात्रेसाठी छोटेमोठे सर्कस, रहाट पाळणे कामगार व्यावसायिक लामजना येथे दिनांक १० मार्च रोजी दाखल झाले होते.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून प्रशासनाने यात्रा महोत्सव रद्द केले आणि लामजना येथे आलेल्या सर्कस व्यावसायिक कामगारांवर आर्थिक संकट ओढवले गेल्याने उपासमारीची वेळ आली. त्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन लामजना गावातील जबाबदार नागरिकांच्या पुढाकाराने या कुटूंबाना १० मार्च ते १० एप्रिल या एक महिन्याच्या आत दोन वेळा किराणा माल आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या.
या उरूस यात्रेसाठी मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी पळशी येथील नितिन लक्ष्मण चव्हाण हे कुटुंब आपल्या १४ सदस्यांसह रॉयल सर्कस चा व्यवसाय पिढ्यांनपिढया चालवतात. ते वर्षभरात जवळपास १० ते १२ यात्रा मध्ये सर्कस चालवून आपला उदरनिर्वाह भागवतात.
त्यासोबत पुण्याच्या बाबुराव येडे यांच्या मालकीचा लहान मोठे रहाटपाळणेचा व्यवसाय असून तो चालवण्यासाठी उत्तरप्रदेशातुन आलेले एकूण ८ कामगार आहेत. परराज्यातील कामगार हे गेल्या १० ते १५ वर्ष झाले रहाट पाळणे चालवण्यासाठी गावोगावी फिरत असतात.मात्र कोरोना संचारबंदी मुळे जमावबंदी मुळे सर्कस व्यवसाय सुद्धा चालवणे कठीण होण्याने हा व्यवसाय अडचणीत येऊन सर्कस मालकांसह कामगार अडचणीत आले आहेत.
या सर्व जवळपास २२ लोकांची लॉकडाऊन काळात गैरसोय होऊ नये म्हणून लामजना ग्रामस्थ ग्रामपंचायत च्यावतीने आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या.

“नितीन लक्ष्मण चव्हाण”-सर्कस व्यावसायिक【उदरनिर्वाह भागवण्यासाठी आम्ही सर्कस व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालवतो,मात्र कोरोना संकटातून वाचवण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक सोयी केल्या जात आहेत. त्यामुळे यात्रा उरूस रद्द होण्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असता लामजना गावकऱ्यांनी आमची अडचण वेळीच लक्षात आजपर्यंत दोन वेळा किराणा माल आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. लॉक डाऊन वाढल्यामुळे अजून बाकी यात्रा मध्ये जाणे अवगड आहे,आणि वाहनांची सोय बंद गाव गाठणे कठीण असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सोयी पुरवाव्या एवढीच आमची अपेक्षा.】
गौतम कुमार:-रहाट पाळणे कामगार【आम्ही रहाट पाळण्यावर कामगार म्हणून काम करत आहोंत. आमच्या व्यवसायावर अडचण येण्याने आमचे मालक सुद्धा पैशाची अडचण सोडवू शकत नाही. आमच्या अडचणी सोडवण्यासाठी लामजना ग्रामस्थांनी आवश्यक सहकार्य केले आहे.
जेंव्हा लॉकडाऊन संपेल आणि रहाट पाळणे चालतील तेंव्हाच कामाचा मोबदला दिला जाईल असे मालकाकडून सांगण्यात येत आहे.
या सर्व कामगारांच्या व्यथा अडचणी जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्यकोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे आणि ठोस प्रहारचे प्रतिनिधी प्रशांत नेटके यांनी जाणून घेण्याचा दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी प्रयत्न केला.
तरी प्रशासनाकडून या अडचणीत सापडलेल्या कामगारांना तात्काळ आणि आवश्यक ती मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







Maharashtra Pune
Maharashtra Mumbai