Maharashtra

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकार गंगाधर सोमवंशी यांना कोविड योद्धा जाहीर करून त्यांच्या वारसांना शासनाने ५० लाखाचे विमा कवच द्यावे. ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकार गंगाधर सोमवंशी यांना कोविड योद्धा जाहीर करून त्यांच्या वारसांना शासनाने ५० लाखाचे विमा कवच द्यावे.
ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.

लक्ष्मण कांबळे

लातुर कोरोनाच्या महामारी मध्ये प्रशासनाच्या बरोबरीनेच महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार बंधूभगिनींचे कोरोना विरोधी लढ्यात मोठे योगदान आहे. समाजजागृती करण्याबरोबरच कोरोना संबंधातील वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकारांना सर्वत्र संचार करावा लागतो. हे कोरोना प्रतिबंधाचे काम करत असताना कोरोना या संसर्गामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, प्रशासनातील अनेक कर्मचारी व पत्रकारांनाही मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकार गंगाधर सोमवंशी यांना कोविड योद्धा जाहीर करून त्यांच्या वारसांना शासनाने ५० लाखाचे विमा कवच द्यावे. ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.लातूर येथील पत्रकार गंगाधर सोमवंशी यांनाही वृत्तपत्राचे काम करत असताना झालेल्या प्रवासात कोरोनाचा संसर्ग झाला. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे पत्रकार गंगाधर सोमवंशी हे शासकीय रुग्णालयात दाखल झाले. खाजगी रुग्णालयातील डिपॉझिट २० हजार, ७५ हजार आणि रोजचे ५ हजार रुपये मला परवडत नाहीत. म्हणून शासकीय रुग्णालयात भरती झालो असल्याचे गंगाधर सोमवंशी यांनी रुग्णालयात भरती झालेल्या दिवशीच दिनांक २८ जुलै रोजी मित्रासाठी प्रिय मित्रांनो म्हणून लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांनी सांगितलेले आहे.
ही चिठ्ठीच वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या बंधू-भगिनींना, समाजाला आणि प्रशासनाला चिंता आणि चिंतन करायला लावणारी आहे.कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकार गंगाधर सोमवंशी यांना कोविड योद्धा जाहीर करून त्यांच्या वारसांना शासनाने ५० लाखाचे विमा कवच द्यावे. ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.पत्रकार हा अधिस्वीकृती पत्र धारक असो अथवा नसो तो पत्रकार आहे हे लक्षात घेऊन कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारास कोरोना योद्धा जाहीर करून त्यांच्या वारसाला पन्नास लाख रुपयांचे विमा कवच देऊन सहकार्य करावे. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदना सोबत पत्रकार गंगाधर सोमवंशी यांनी मृत्यूपूर्वी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या दिवशीच प्रिय मित्रांनो म्हणून लिहून ठेवलेल्या चिठ्ठीची झेरॉक्स प्रत हि व्यंकटराव पनाळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button