Maharashtra

मोठा वाघोदा कोरोना मुक्त मोठा वाघोदेकरांसाठी दिलासादायक बातमी

मोठा वाघोदा कोरोना मुक्त
मोठा वाघोदेकरांसाठी दिलासादायक बातमी

प्रतिनिधी मुबारक तडवी

येथील दि.२० जून रोजी दोन मयतांसह १३पैकी १० रुग्णांनी कोरोनावर मात करीत घरवापसी झाली होती तर एक संक्रमित महिला रुग्णावर कोविड १९ सेंटरमध्ये उपचार सुरू होते आज दिनांक २४ जून ला या संक्रमित महिला रुग्णानेही कोरोनाला हरवून विजय प्राप्त केला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे मोठा वाघोद्यात दोन मयतांसह ११ संक्रमित रुग्ण आढळले होते व त्यां संक्रमितांवर कोविड १९ सेंटरला उपचार सुरू होते त्यातील २० जून ला १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करुन विजय मिळवला होता व उर्वरित एक महिला संक्रमितांवर उपचार सुरू होते या महिला रुग्णानेही कोरोनाला लढा देत आज २४ जून रोजी विजय मिळविला व डिस्चार्ज ही मिळाल्यामुळे मोठा वाघोदा वाघोदा वासियांना आनंददायी व दिलासादायक बातमी मिळाली असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे मोठा वाघोद्यातील ११ बाधितांनी कोरोनाशी झुंज देत विजयश्री मिळविला व त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी अहोरात्र अथक परिश्रम घेत आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, जिल्हाधिकारी कमांडंट ऑफिसर फैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले. रावेर च्या तहसीलदार सौ.उषाराणी देवगुंणे तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराज पाटील,सपोनि राहुल वाघ, यांच्यासह मोठा वाघोदा ग्रामपंचायत प्रशासन उपसरपंच सदस्यासह, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, बालविकास विभाग सेविका मदतनिस,आशासेविका व सर्व विभागांचे कर्मचारी यांनी विशेष लक्ष केंद्रित करून गावात विविध उपाय योजना सह ग्रामपंचायतीने केलेल्या पाच दिवशीय जनता कर्फ्यू ला वाघोदा वासियांनी ही सहभाग नोंदवित जनता कर्फ्यू १००% यशस्वी करीत कोरोनाची साखळी तोडण्यास यश मिळविले आहे ११ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनाला हरवित कोरोनामुक्त होत विजयश्री मिळविला आहे व त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळालेली आहे या अनुषंगाने आज दिनांक २४ जून रोजी मोठा वाघोदा कोरोना मुक्त झाले असल्याचे दिलासादायक वृत्त रावेर तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराज पाटील यांचेशी संपर्क केला असता त्यांनी ह्या माहितीला दुजोरा देत मोठा वाघोदा गावात आजरोजी एकही कोरोना रुग्ण नाही गांव कोरोनामुक्त झाले असल्याची आनदादायी बातमी त्यांनी दिली मात्र गांव कोरोनामुक्त झाले म्हणजे सर्व संपलं या गुमानित गावकर्यांनी न राहता सावधानता बाळगावी , घराबाहेर पडताना सुरक्षितता बाळगावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडावर मास्क लावूनच घराबाहेर पडावे तसेच शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीसह प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button