आदिवासी मोर्चाचे श्रेय लाटण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न…. कुणीही भ्रमात राहू नये…आदिवासींना आणि समाजाला फसवू नये….
अमळनेर
काल आदिवासी बांधवांचा भव्य मोर्चा विविध मूलभूत मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आला होता. हा संपूर्ण मोर्चा फक्त आदिवासी बांधवानी आयोजित केला होता. यात 2019 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असून ही श्रेयवादाची लढाई आमच्या गरीब आणि गरजू आदिवासी बांधवांसोबत कोणी ही खेळू नये .
आम्ही आदिवासी प्रत्येक कार्यासाठी सक्षम असून आमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला कोणत्याही राजकीय कुबडीची गरज नाही.याच कृपया नोंद घ्यावी. आता पर्यंत 70 वर्षात आमचे प्रश्न समस्या समजल्या नाहीत आता निवडणूक जवळ आली की सगळ्यांना पुळका सुटतो आदीवासी बांधवांचा परंतु हे राजकारण कोणीही अमच्यासोबत खेळू नये.वर्षां नूवर्षांपासून आदिवासी बांधव समाज हा अन्याय अत्याचाराशी लढत आहे.आजही मूलभूत सुविधा पासून वंचित आहे. परंतु वेळ आली की पुढे येऊन चमकोगिरी करणारे नेते तेंव्हा कुठे असतात जेंव्हा गरज असते. आम्हाला बाहेरच्या समाजाच्या नेत्यांची गरज नसून आमचे कार्यकर्ते आणि सामाजिक भान ठेवून कार्य करणारे पदाधिकारी आमच्या साठी पुरेसे आहेत.आम्हीच नेते आहोत आम्हाला *कामा पुरता मामा* लोकांची गरज नाही याची जाणीव ठेवावी