Chimur

शिक्षणामुळे यशाचे शिखर गाठता येते : डॉ. दिपक यावले

शिक्षणामुळे यशाचे शिखर गाठता येते : डॉ. दिपक यावले
रा. तु. महाविद्यालयात वार्षिकोत्सव कार्यक्रम

चिमूर/प्रतिनिधी –ज्ञानेश्वर जुमनाके

मानवी जीवनाचा सर्वागीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. देशाला प्रभावी राष्ट्र बनविण्यात युवक महत्वपुर्ण भुमिका बजावु शकतात. त्यामुळे युवकांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणामुळे यशाचे शिखर गाठता येते असे प्रतिपादन गांधीसेवा शिक्षण समिती चिमुरचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले यांनी व्यक्त केले.
ते राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात वार्षिकोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया, गांधीसेवा शिक्षण समिती चिमुरचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, संस्था उपाध्यक्ष सय्यद, सचिव विनायक कापसे, सदस्य जनार्धनबापू चौधरी, नारायण डांगाले, श्रीहरी गोहणे, माजी प्राध्यापक आबाजी मेश्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यादरम्यान महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. गुणवंत विद्याथांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य कार्तिक पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला विधार्थी कल्याण मंडळाचे प्रा. डॉ. हरेश गजभिये, कनिष्ट महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. राकेश कुमरे, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. या वार्षिकोत्सव कार्यक्रमाला विधार्थनि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वार्षिकोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात विद्याथांना स्नेहभोजन देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button