राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा किसान मोर्चा..
प्रतिनिधी : विनोद जाधव यावल
यावल : केळी पीक विमा व शेतकरी विरोधी राज्य सरकार विरोधातील दि. ०९ नोव्हेंबरच्या किसान मोर्चा संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे बैठक घेण्यात आली. यावेळी उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संयोजक सुरेशजी धनके, कृषी भूषण नारायणबापू चौधरी, श्री.शरद दादा महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जि.प.सदस्य छोटूभाऊ पाटील, जि.प.सदस्य सौ.सविताताई भालेराव, डॉ.विजय धांडे, श्री.टी.के.महाजन, श्री.उमेशदादा पाटील, डॉ.कुंदन फेगडे, श्री.हर्षल पाटील, कृ.ऊ.बा.स. सभापती श्री.उमेशदादा पाटील, तालुकाध्यक्ष श्री.उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस श्री.विलास चौधरी, श्री. उज्जैनसिंग राजपूत, श्री.निलेश गडे, श्री.सोनवणे सर व यावल, सांगवी, कठोरा, चितोडे, सातोद, कोळवद, वड्री, परसाळा, मोहराळा, कोरपावली, राजोरा, मायसांगवी, अट्रावल, बोरावल, भालशिव, पिंप्री, अंजाळा, निमगांव, टेंभी, टाकरखेडा, विरावली, महलखेडी गांवातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.