Chopda

विरवाडे येथील घडलेल्या दुःखद घटनेच्या विषयी सोशल मीडिया वर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्ती विरुद्ध चोपडा पोलिस निरीक्षक व तहसिलदार यांना निवेदन

विरवाडे येथील घडलेल्या दुःखद घटनेच्या विषयी सोशल मीडिया वर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्ती विरुद्ध चोपडा पोलिस निरीक्षक व तहसिलदार यांना निवेदन

रजनीकांत पाटील

चोपडा-विरवाडे येथे गेल्या ०१/०९/२०२० रोजी गावातील राजपूत समाजातील तीन तरुण मुलांचा नदीच्या डोहात दुर्दैवाने अंत झाला.यामुळे तालुकभर शोककळा पसरली असता अनेक लोकांनी सोशल मीडिया वर या युवकांना श्रद्धांजली अर्पण केली. यातच दि.०६/०९/२०२० रोजी अश्याच श्रद्धांजली च्या पोस्ट वर एका माणूसकी हीन,नालायक वृत्तीच्या राजकमल पाटील या व्यक्तीने मनाला दुखवणारी कमेंट केली की,”खुप छान झाले,नदीचे पाणी घाण करायला गेले होते आणि स्वतः च गेले”. तसेच या व्यक्तीशी संपर्क केला असता त्याने हिंदू देव-देवतांचे ही विडंबना केली.व या मृतात्माच्या ही अवहेलना केली.

या घटनेविषयी संपूर्ण तालुकाभर हळहळ व्यक्त होत असताना अश्या अतिशय घाणेरड्या व खालच्या दर्जाचे कमेंट करुन सदर व्यक्तीने हिंदू बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचवली.
तरी यासंबंधी आज चोपडा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक व तहसिलदार साहेब यांना त्या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन देवून निषेध केला.यावेळी दिव्यांक सावंत,करण राजपूत,अक्षय पाटील,प्रणव राजपूत,प्रेम बाविस्कर, देवेंद्र शिरसाठ,सोनू पाटील, निलेश जगताप उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button