Amalner

?️अमळनेर कट्टा…पोलखोल…ओ प्रांत मॅडम (अध्यक्ष कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती)अमळनेर कोव्हीड सेंटरला रुग्णांना प्यायला पाणी नाही…!हे इग्नोर कस काय करता..?अमळनेर आपत्ती व्यवस्थापन समिती चा भोंगळ कारभार..!

?️अमळनेर कट्टा…ओ प्रांत मॅडम अमळनेर कोव्हीड सेंटरला रुग्णांना प्यायला पाणी नाही…!हे “इग्नोर” कस काय करता..?अमळनेर आपत्ती व्यवस्थापन समिती चा भोंगळ कारभार..!
अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून रुग्ण व इतर लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापन काळात ग्रामीण रुग्णालय कोव्हीड सेंटर मध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. आज आताच्या घडीला ह्या रुग्णालयात 12 रुग्ण उपचार घेत आहेत.ह्या रुग्णांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होत असून पिण्याचे पाणी उपलब्ध करू न शकणारे प्रशासन गप्पा मात्र खूप मोठ्या करत आहे..भर उन्हाळ्यात अत्यन्त वाईट अवस्था असताना सामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे.ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचे मशीन बंद असून कोरडे खट पडले आहे. कोव्हीड केअर सेंटरला रुग्णांच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची असून अमळनेर प्रशासन ह्या बाबतीत कमी पडले आहे. पिण्याचे जिथे उपलब्ध नाही तिथे इतर सुविधा काय उपलब्ध असतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रुग्णांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रशासनाने डोळ्या वर पट्टी बांधलेली असून फक्त सामान्य लोकांवर कार्यवाहीचा बडगा उचलून चमकोगिरी केली जात आहे. गेल्या संपूर्ण आठवडाभर रुग्णांना पिण्याचे पाणी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष उपविभागीय अधिकारी हे असून त्यांचे जाणून बुजून ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.त्यांना माहीतच नसेल का इथे प्यायला पाणी उपलब्ध नाही? की माहीत असूनही काना डोळा करण्यात आला आहे…
ग्रामीण रुग्णालयाची सर्व जबाबदारी ही डॉ ताळे यांच्या कडे असून ह्या सर्व आपत्ती व्यवस्थापन काळात डॉ ताळे यांचे नियोजन बऱ्याच अंशी कोलमडले आहे.ह्याचे अनेक उदा संपुर्ण वर्षात समोर आले आहेत.डॉ ताळे यांच्या बाबतीत अनेक तक्रारी असून नागरिकांनी आता त्यांच्या कार्याबद्दल आणि तो वागणुकीबद्दल तक्रारी करावयास सुरुवात केली आहे.त्यांच्या वर कोणाचाही लगाम नसून आपत्ती व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष उपविभागीय अधिकारी ह्यांचे पूर्ण पणे दुर्लक्ष ह्या विभागा कडे आहे.सामान्य माणसाला कायद्याचा बडगा दाखविण्याऱ्या प्रशासनाला स्वतःच्या चुका मात्र दिसत नाहीत.आज पासून ठोस प्रहार याबाबतीत सर्व पोल खोल करणार असून एकतर्फी बॅटिंग आज पासून करणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button