?️ अमळनेर कट्टा … सामाजिक कार्यकर्ता श्री.जयेश माळी यांनी भारत विकास ग्रुप (BVG) च्या महत्वपूर्ण ‘ग्राम दूत’ योजनेचा पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रतील सर्वाधिक गावातील युवक जोडून सहावा क्रमांक पटकावला.
अमळनेर : BVG Group भारत देशातील एकात्मिक सेवा पुरवणारी सर्वांत मोठी संस्था,कंपनी असून ८०,००० पेक्षा जास्त कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. सेवा क्षेत्रामध्ये सुरु झालेला BVG Group सध्या कृषी, आरोग्य, अन्नपदार्थ, कौशल्य रोजगार क्षेत्रामध्ये विस्तारित होत आहे.
भारत विकास ग्रुप चे संस्थापक मा. हणमंतराव गायकवाड साहेबांचे स्वप्न आहे की, १० लाख तरुणांना रोजगार देण्याच्या ध्येयपूर्तीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक युवा ग्राम दूत नेमण्याचे ठरविने, अशी नावीन्यपूर्ण योजना आहे.
‘ग्राम दूत’ असे या योजनेचे नाव असून यामध्ये आपण BVG कंपनी सोबत संलग्न व्यवसाय करु शकतां. यामध्ये आपण स्थित असणाऱ्या गावांमधील कृषी,सामाजिक, राजकीय, ग्रामपंचायत, प्रशासन, शासकीय, आरोग्य, कौशल्य, युवक, रोजगार, स्वयंरोजगार विषयक तसेच गावातील इतर गोष्टींविषयी माहिती देवून-घेऊन अर्थार्जन करू शकता याद्वारे ग्राम दूत म्हणून आपण गावात जन संपर्क वाढवून अनेक सामाजिक कार्य करू शकतात.
या योजनेमध्ये मा.श्री.रवींद्र घाटे सर,पुणे व साने गुरुजी फौंडेशन,अमळनेर चे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील सर, याचे श्री जयेश माळी या मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
सामाजिक कार्यकर्ता श्री. जयेश माळी यांची महाराष्ट्रतील सर्वाधिक गावातील युवकांना जोडले या बद्दल भारत विकास ग्रुप BVG या टीम कडून अभिनंदन व कौतुक केले.