kalamb

छत्रपती शिवाजी नगर कळंब येथील धोकादायक विद्युत पोल काढण्याची नागरिकांची मागणी

छत्रपती शिवाजी नगर कळंब येथील धोकादायक विद्युत पोल काढण्याची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी :-सलमान मुल्ला

कळंब शहरातील येरमाळा रोड वरील महावितरण समोरील छत्रपती शिवाजी नगर येथील धोकादायक विद्युत खांब काढण्याची मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद कळंब व अभियंता विद्युत वितरण कंपनी यांचे कडे करण्यात केली आहे.

छत्रपती शिवाजी नगर येथील भरवस्तीत उभा असलेला खांब पाऊस व वादळ यामुळे पूर्वीच झुकलेला होता. या बाबत तोंडी वारंवार मागणी नागिकांमधून होत होती, परंतु मागील दोन दिवसात अधिक झुकल्या सारखा दिसत असून भरवस्तीत असल्याने तो कोसळल्यास जीवित वित्त हानी होण्याची शक्यता आहे. त्या मुळे छत्रपती शिवाजी नगर परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे, तसेच शिवाजी नगर मधून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर दोन विद्युत खांब उभा करण्यात आले असून या मुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या चुकीच्या व धोकादायक विद्युत खांब काढून घेवून त्यामुळे होणारे संकट टाळण्यात यावे यासाठी शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी देि 4 ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी नगर परिषद कळंब व अभियंता विद्युत वितरण कंपनी यांना निवेदन देवून आठ दिवसात कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर शिवसेना उप शहर प्रमुख अॅड. मंदार मुळीक, विठ्ठलराव गुंड, गजानन पाटील, शिवसंब पकवे, दत्तात्रय दळवे, प्रशांत घुटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button