Akkalkot

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा भक्तांना रांगेतून पर्यावरण पूरक द्रोणातून शिरा प्रसाद दिला जाणार..!

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा

भक्तांना रांगेतून पर्यावरण पूरक द्रोणातून शिरा प्रसाद दिला जाणार..!

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा सोमवार दि.१६ मार्च ते मंगळवार दि. ३१ मार्च २०२० पर्यंत दैनंदिन दोन वेळा दिला जाणारा महाप्रसाद म्हणजे पूर्ण भोजन बसून देण्याऐवजी विशिष्ट अंतर ठेवून प्रवाही पद्दतीने भक्तांना रांगेतून पर्यावरण पूरक द्रोणातून शिरा प्रसाद दिला जाणार..!

कृष्णा यादव, अक्कलकोट :

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा सोमवार दि.१६ मार्च ते मंगळवार दि. ३१ मार्च २०२० पर्यंत दैनंदिन दोन वेळा दिला जाणारा महाप्रसाद म्हणजे पूर्ण भोजन बसून देण्या ऐवजी विशिष्ट अंतर ठेवून प्रवाही पद्दतीने भक्तांना रांगेतून पर्यावरण पूरक द्रोणातून शिरा प्रसाद दिला जाणार आहे अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आपल्या आदर्शवत सेवाभावी कार्याने प्रसिध्द आहे. दररोज सुमारे १५ ते २० हजार भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. तर विविध उत्सव प्रसंगी ही संख्या लाखांचा घरात जाते. हे पाहता भक्तांच्या हितासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन वेळा दिला जाणारा महाप्रसाद म्हणजे पूर्ण भोजन बसून देण्या ऐवजी विशिष्ट अंतर ठेवून प्रवाही पद्दतीने भक्तांना रांगेतून पर्यावरण पूरक द्रोणातून शिरा प्रसाद दिला जाणार आहे. तसेच संध्याकाळी याच पद्धतीने प्रसाद दिला जाणार आहे. परिणामी भक्तांचा एकमेकाशी मोठ्या प्रमाणात संपर्क होवू शकणार नांही. प्रसाद ही मिळेल गर्दीही टळेल..

हा उपक्रम सोमवार दि.१६ मार्च ते मंगळवार दि. ३१ मार्च २०२० पर्यंत चालू करण्याचा निर्णय घेतला आहे, दैनदिन स्वामींची महापूजा आणि स्वामींना महानैविद्य अर्पण केला जाणार आहे, कोरेनाचे संकट दूर होऊन परिस्थिती नियंत्रणात येई पर्यंत हा उपक्रम चालू राहणार असून, त्यानंतर पुन्हा दोन वेळेचा दैनंदिन मोफत महाप्रसाद पूर्वी प्रमाणे दिला जाणार आहे याची नोंद भक्तांनी घ्यावी. आणि जनहितार्थ घेतलेल्या निर्णयाला भक्तांनी सहकार्य करावी असे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी सुध्दा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, वैयक्तिक, कौटुंबिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखावी, एकमेकांमध्ये कमीतकमी ३ फुट अंतर ठेवावी, हस्तांदोलन न करता नमस्कार करा, गर्दीत मिसळू नका किंवा गर्दीत जाण्याचे टाळा, शिंकताना व खोकताना तोंडावर हातरुमाल लावावा किंवा तोंडावर हात ठेवावा, समोरच्या व्ह्याक्तीवर थुंकी जाऊ नये याची दक्षता घ्यावी, साबणाने किंवा सँनटायझरने हात वेळोवेळी धुवावे, तोंडावर, डोळ्यावर, नाकावर, चेहऱ्यावर हात फिरवू नका. साबणाने हात ३० सेकेंद स्वच्छ धुवून मगच चेहऱ्यावर हात फिरवा, सार्वजनिक ठिकाणी व परिसरात स्वच्छता ठेवावी, उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी भरपूर प्यावे, स्वच्छता राखा-स्पर्श टाळा, कोरोना विषाणूबाबत स्वामी भक्तांनी न घाबरता सतर्कता बाळगावी आणि वर सांगितलेल्या नियमाचे पालन करावे ही विनंती अन्नछत्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. याप्रसंगी न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त लक्ष्मण पाटील, न्यासाचे विधी सल्लागार अँड.नितीन हबीब, अँड.संतोष खोबरे, मानद जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब निंबाळकर, आप्पा हंचाटे, मनोज निकम, प्रविण देशमुख, धानप्पा उमदी, नामा भोसले, कुमार सलबत्ते, चंद्रकांत हिबारे, मनोज चुंगीकर, प्रकाश गायकवाड, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, बाबुशा महिंद्रकर, रवींद्र काटकर यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

पहिले युनिट :

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आपल्या आदर्शवत सेवाभावी कार्याने प्रसिध्द आहे. दररोज सुमारे १५ ते २० हजार भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. तर विविध उत्सव प्रसंगी ही संख्या लाखांचा घरात जाते. हे पाहता भक्तांच्या हितासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन वेळा दिला जाणारा महाप्रसाद म्हणजे पूर्ण भोजन बसून देण्या ऐवजी विशिष्ट अंतर ठेवून प्रवाही पद्दतीने भक्तांना रांगेतून पर्यावरण पूरक द्रोणातून शिरा प्रसाद दिला जाणार आहे. तसेच संध्याकाळी याच पद्धतीने प्रसाद दिला जाणार आहे. परिणामी भक्तांचा एकमेकाशी मोठ्या प्रमाणात संपर्क होवू शकणार नांही. प्रसाद ही मिळेल गर्दीही टळेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button