Nashik

भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांची जीवघेणी भटकंती …. तीन दिवसांनी पूर ओसरल्यावर कारामाईनदीच्या पाण्यात जीवमुठीत घेऊन आणले पाणी……..

भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांची जीवघेणी भटकंती ….
तीन दिवसांनी पूर ओसरल्यावर कारामाईनदीच्या पाण्यात जीवमुठीत घेऊन आणले पाणी……..

सुनील घुमरे

नाशिक जिल्ह्याची वाटचाल स्मार्ट सिटी कडे सुरू आहे ही गोष्ट आनंदाची आहे पण स्वतंत्र काळापासून निफाड तालुक्यात असलेल्या नांदुर्डी गावाच्या परिसरातील आदिवासी वस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने ढुकुन देखील बघितलेले नाही.शिवाय स्थानिक ग्रामपंचायतीने देखील अशा वस्तीची जबाबदारी झटकून टाकली आहे.त्यांना “घरकुल, पाणी, शौचालय ना रस्ते ना लाईट ” फक्त जन्माला या मतदानाचा हक्क बजावा आणि दारिद्र सहन करून मरा अशी परिस्थिती आज मितीला कोलोफॉर्मिया असलेल्या निफाड तालुक्यातील गावात बघायला मिळते.भर पावसातही पाण्यासाठी जीवघेणी भटकंती करण्याचे दारिद्र्य निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील आदिवासी महिलांवर आली आहे.

नांदुर्डी गावाच्या स्मशान भूमी जवळील व राणवड कारखान्या लगत डाव्या कालव्या जवळ असलेल्या दोन आदिवासी वस्त्या या वस्तीत पाणी,घरकुल, शौचालय,लाईट,रस्ते विना उपेक्षा आजही सुरु असल्याचे भयाण वास्तव पहावयास मिळत असून स्वतंत्र काळानंतरही मानवी जीवन मूलभूत हक्कापासून वंचित असून शासकीय सुविधा पासून कोसो मेल दूर असल्याचे चित्र आहे.भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नांदुर्डी व उगाव खेड या दोन्ही गावाच्या मधोमध असलेली कारामाईनदी ओलांडून उगावखेड येथील शेतकरी निफाडे यांच्या विहिरीतून पाणी आणावे लागते पण नदीचा ओस वाढला तर पाण्यासाठी जीव पाण्यातच वाहून जाईल ही भीतीही न बाळगता या महिलांची नदीतून ही कसरत शासनाने वेळेत लक्ष देणे गरजेचे आहे.

सहाशे ते सातशे आदिवासी लोक वस्ती असलेल्या नांदुर्डी गावातील सूर्यवंशी नगर व राघोजी भांगरे नगर अशा दोन आदिवासी वस्तीत चारशे ते पाचशे नागरिकांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड ,रेशन कार्ड देखील आहे मात्र परिसरात कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येतात व निवडणूका झाल्यावर फिरकून पण पाहत नाही.परिणामी त्या वस्तीतील बांधवाना कुठल्याही सोयी व सुविधा नसल्याने आत्ता पर्यंत लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासनाचीच खैरात वाटली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षांहून अधिक काळ उलटला मात्र आदिवासी समाज विकासाच्या कोसो दूर असल्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल समाज बांधवांना अजून पक्की घरे नाही जवळच गावासाठी असलेले शौचलाय व समशान भूमी आहे त्या मुळे हा परिसर अस्वच्छ आहे त्यामुळे विचू काटे व सरपटणारे जनावरे कित्येक वेळा या वस्त्या मध्ये आढळत असून जीव मुठीत धरून हे बांधव राहत आहे.

मग शासनाच्या दारिद्य्ररेषेच्या यादीत कोण..?
“बर्दान लाऊन उभी केलेली घरे या आदिवासी बांधवांची असून त्यांच्या पाचवीलाच दारिद्र्य पूजलेले वास्तव्य दिसून येते”तरीदेखील या समाजाचे दारिद्र्य रेषेच्या यादीत नाव नाही व त्याना कुठल्याही योजनेचा लाभ मिळाला नाही मग शासनाच्या दारिद्र्य रेषेखालील योजनेचा लाभ प्लॅट व पक्या घरामध्ये राहणाऱ्या स्वतःला वंचीत व दारिद्र्य यादीत समजणाऱ्या समाजाला मिळत आहे कि, काय .? हे सांगणे कठीण आहे.पण शासनाने याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे तेव्हाच खऱ्या वंचित समाजाची प्रगती व अशा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणता येईल.

आदिवासी समाजाच्या बोटावर मोजता येतील एवढ्या गरजा आहे पण कोणत्याही नेत्याने किंवा शासनाने त्या सोडवण्याचा प्रत्यन केला नाही.वारंवार पत्रव्यवहार व हंडा मोर्चा करून देखील गेंड्याच्या कातढ्याच शासन दखल घेत नाही.नेते,पुढारी जेवढे जबाबदार आहे तेवढे जबाबदार जिल्हाधिकारी, तहसीलदार,तलाठी ,ग्रामसेवक ही यंत्रणा आहे
वंदनाताई कुडमते
आदिवासी शक्ती सेना
उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा

वेळोवेळी स्थानिक व उच्च स्तरावर पाठपुरावा करून देखील आमच्या मूलभूत समस्याबाबत प्रशासन उदासीनता दाखवत आहे.आम्ही सोन,नान,गाडी बंगला नाही मागत फक्त आम्हाला पिण्यासाठी पाणी द्या व लाईट व घरकुल द्या
सरला कोकाटे
स्थानिक महिला नांदुर्डी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button