India

पारंपरिक आदिवासी पेहराव..अनवाणी पद्मश्री स्विकारणाऱ्या कोण आहे पद्मश्री पुरस्कार विजेत्या  तुलसी गौडा..!वाचा आदिवासी वनराणीची कहाणी..!

कोण आहे पद्मश्री पुरस्कार विजेत्या तुलसी गौडा..!वाचा आदिवासी वनराणीची कहाणी..!

दिल्ली गोल साधी साडी गुंडाळून पायात चप्पल नसलेली एक आदिवासी वनराणी..चकचकीत फरशी,उंच झुबंर, मोठ मोठ्या आलिशान सतरंज्या,दिमाखदार सोहळा,समोर भारत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि आमची जंगलची राणी वनराणी एकदम साध्या वेषात वय 72 वर्ष…पेहराव पूर्ण पणे आदिवासी पारंपरिक…दागिने केशरचना पारंपरिक आदिवासी आणि पुरस्कार देशातील चौथा श्रेष्ठ सन्मान पद्मश्री पुरस्कार… सर्व मोठ मोठया राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांसोबत सर्व आदिवासी बंधू भगिनींना गर्व वाटावा मान उंचावी असा अंगावर शहारे आणणारा श्रेष्ठ प्रसंग…

नुकताच दिल्लीत पद्मश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ह्यात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘जंगलाच्या विश्वकोश’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आदिवासी तुलसी गौडा यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चला तर जाणून घेऊ या ह्या तुलसी गौडा यांची प्रेरणादायी कहाणी…

अशिक्षित आणि कोणतेही पुरेशी साधने नसतानाही केवळ मनोबल,इच्छाशक्ती,प्रामाणिकता,ह्या जोरावर मोठा बदल घडवून आणला जाऊ शकतो हे तुलसी गौडा यांच्या जीवन पटातून आपल्या लक्षात येईल. अनवाणी अन अंगावर गुंडाळलेला एकाच कपड्यात जंगलाच्या जिवंत विश्वकोश राष्ट्रपती पुरस्कारासाठी जेव्हा हजर झाल्या तेव्हा त्यांच्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपारिक गुंडाळलेली साडी, गळ्यात मनगटात दागिने आणि आणि केस एका अंबाड्यात बांधलेले अशा सध्या वेशातील तुलसी सर्वांच्याच कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय आहेत.

पर्यावरणवादी तुलसी आजींना मानवी “जंगलाचा विश्वकोश” म्हणतात, परंतु आदिवासी जमातीत हलक्की वोक्कलिगा त्यांना “वनदेवी” म्हणून ओळखतात. तुळशी गौडा जीवनसंघर्षाचे सवोत्तम उदाहरण आहे, शिक्षण आणि आधुनिक संसाधनांशिवाय जंगलात आमूलाग्र बदल घडवून आणता येतील याचे त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत.

जीवनपट..

तुलशी यांचा जन्म कर्नाटकातील होनाली गावात आदिवासी हलक्की जमातीच्या कुटुंबात झाला. हा आदिवासी समाज वनस्पती आणि औषधी वनस्पतींचे पुरेशा ज्ञानासाठी ओळखला जातो.तीन वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. आई आणि बहिणीसोबत कर्नाटक वनविभागात मजुरी करू लागल्या. कुटुंबातील या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना शाळेत जाऊन प्राथमिक शिक्षण देखील घेता आले नाही. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले पण दुर्दैवाने पतीचेही अकाली निधन झाले. आपल्या आयुष्यातील दुःख आणि एकाकीपणावर मात करण्यासाठी तुलशी गौडा यांनी विविध वृक्ष लावणे आणि त्यांची काळजी घेण्याचे काम सुरु ठेवले. सात दशकांच्या प्रदीर्घ काळात वनक्षेत्रात काम करताना खोलवर जन्मजात रुजलेल्या सांस्कृतिक वारशामुळे निसर्गाचे संरक्षण, देखरेख आणि लागवड करण्याची जबाबदारी सांभाळत आहेत.त्यांनी 60 वर्षांहून अधिक काळ पर्यावरणासाठी काम केलंय. त्यांनी आतापर्यंत 30 हजारांहून अधिक रोपे लावली आहेत. त्या सध्या वनविभागाच्या नर्सरीची काळजी घेत आहेत.वयाच्या 70 व्या वर्षी त्या निवृत्त झाल्या..पण तरीही आजही त्या कार्यरत आहेत…

तुलसी गौडा नामशेष होत आलेल्या वनस्पतींचे संगोपन करून तरुण पिढीला पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देतात.७२ वर्षांच्या तुलसी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात किती लहान मोठी झाडे, वेली लावल्या याचे मोजमाप करता येणार नाही. महाकाय वृक्षांपासून ते लहान झुडपांपर्यंत वनस्पतींचे जंगल तयार करण्याचे अद्भुत ज्ञान त्यांच्याकडे आहे. कोणत्या झाडाला किती पाणी द्यायचे, कोणत्या प्रकारच्या मातीत कोणती झाडे आणि वनस्पती वाढतात, कोणत्या लता वेली एकमेकांना पूरक होतील, औषधी गुणधर्मांची झाडे कोणती हे सर्व त्यांना तोंडपाठ आहे. विविध वनस्पती वृक्षांचे उपयोग त्यावर अवलंबून असणारी जैवविविधता आणि पक्षी प्राण्यांना त्यांच्या या ज्ञानामुळे होणारा उपयोग या सर्वांच्या समीकरणामुळे त्यांना “जंगलाच्या विश्वकोश” असेही संबोधले जाते. शाळेत शिकून कोणतेही ज्ञान नसतानाही तुलशी यांचे जंगल आणि वनस्पतींचे ज्ञान एखाद्या पर्यावरणवादीशास्त्रज्ञ पेक्षा कमी नाही.
आजही तुलशी वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सक्रिय आहेत. त्याच बरोबर त्या लहान मुलांना झाडांशिवाय ही पृथ्वी जगण्यास योग्य नाही, आपल्या जीवनासाठी किती महत्वाची आहेत अशी शिकवण देतात. निसर्गावरील प्रेमामुळे आजही त्या जास्तीत जास्त वेळ जंगलात घालवितात. जंगलातील कोणत्याही ठिकाणी प्रत्येक प्रजातीचे मातृवृक्ष ओळखण्यास त्या सक्षम आहेत. जेव्हा मातृवृक्षातून बिया येतात तेव्हा वनस्पतींचे पुनरुत्पादन अधिक यशस्वी होते. ही झाडे कधी फुलतात आणि अंकुरतात हे तुलशी यांना माहीत आहे आणि त्या बिया गोळा करण्यासाठी सर्वोत्तम क्षण निवडतात. त्यांना हे लेखी स्वरूपात मांडता येत नाही परंतु ही जंगलाची भाषा अनुभवाने अवगत आहे. त्यांचे हे अनमोल काम पाहणे देखील एक अविश्वसनीय अनुभव आहे.

राष्ट्रपती कार्यालयाचं ट्वीट-

“राष्ट्रपती कोविंद यांनी सामाजिक कार्यासाठी श्रीमती तुलसी गौडा यांना पद्मश्री प्रदान केलं. त्या कर्नाटकातील एक पर्यावरणवादी आहेत. ज्यांनी 30,000 हून अधिक रोपं लावली आहेत. त्या गेल्या 6 दशकांपासून पर्यावरण संवर्धन कार्यात सहभागी आहेत,” भारताच्या राष्ट्रपती कार्यालयावरून ट्वीट करण्यात आलंय

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button