हायटेक कं.ज्वारीच्या बियाणाने शेतकऱ्यांची फसवणुक..पंचनामे होण्याची मागणी
शब्बीर खान
हिंगोणा ता. यावल येथिल परिसरात शेतकरी वर्ग पूर्णपणे हायटेक कंपनीच्या ज्वारीच्या बियाणाने त्रस्त झालेला दिसुन येत आहे. कारण शेतकऱ्यांनी माहग मोलाचे ज्वारीच्या बियाणांची पेरणी कलेली होती पेरणी समान धारक झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आंनंदाचे वातावरण निर्माण झाले होते पण जसे जसे ज्वारीचे पिक मोठ मोठे होत गेले पण त्यांना एकही ज्वारीची कणुस आले नाही फक्त उभे धांडे दिसत आहे . यासाठी फक्त जा शेतकऱ्यांनी . हायटेक कंपनीच्या ज्वारी बियाणांची पेरणी केली आहे त्याच ज्वारीच्या बियाणाला कंस आलेले नाही यासाठी पूर्ण पणे शेतकरी वर्ग चिताग्रस्त झालेला आहे तसेच शेतकरी वर्गाने परिसरात जास्तीत जास्त हायटेक कंपनीच्या ज्वारी बियाणांची पेरणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांनेवर संकटावर संकट येत असून त्यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा आहे . तसेच यावल तालुक्यातिल कृषी विभागाने व तहसिलदार साहेब यांनी परिसरात लवकरात लवकर पंचनामे करून लवकरात लवकर शेतकरी वर्गानां मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे.
माझ्या ४ अेकर शेतामध्ये हायटेक कंपनीच्या ज्वारी च्या बियाणांची पेरणी कलेली होत तरी त्या ज्वारीच्या पिकाला ऐकही ज्वारीचे कणुस आलेले नाही तरी आमची या बियाणाने फसवणुक झालेली आहे. तरी कंपणीवर कृषी विभागाने कारवाई करावी.कमलाकर गाजरे( शेतकरी)