Chalisgaon

ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे चाळीसगाव तालुक्यातील कापूस व मका उत्पादक शेतकरी बांधवाना आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन…

दि.२० जून शनिवार च्या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे चाळीसगाव तालुक्यातील कापूस व मका उत्पादक शेतकरी बांधवाना आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन…

भाजप कार्यालयात स्व.हरिभाऊ जावळे यांना वाहण्यात आली श्रद्धांजली…

नितीन माळे

चाळीसगाव – सध्या शेतीची कामे सुरु आहेत, प्रत्येक शेतकरी कामात व्यस्त आहे मात्र एकीकडे आपण शेतकऱ्यांना जगाचा अन्नदाता म्हणतो मात्र दुसरीकडे त्याच शेतकऱ्याने पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नाही, खरेदी केली जात नाही.
चाळीसगाव तालुक्यात कापूस खरेदीसाठी ३०००, मका ज्वारी खरेदीसाठी १३०० हून शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र दीड महिना झाला तरी २५ टक्के सुद्धा शेतकऱ्यांचा कापूस, मका खरेदी झाली नाही उलट शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापारी आणि पुढारी आपला माल तिथे खपवत आहेत म्हणून या क्वारंटाइन झालेल्या सरकारला जाग करण्यासाठी, शेतकऱ्याचे बोंड विकले जात असताना तोंड न उघडणाऱ्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी दि.२० जून शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौंक सिग्नल पॉइंट येथे सकाळी १० वाजता आपण ठिय्या आंदोलन करणार आहोत. तरी आपण जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कापूस व मका – ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.
भारतीय जनता पक्ष व आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात झालेल्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य उध्दवरावजी महाजन, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजप तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, पं स सदस्य सुभाष दादा पाटील, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, महिला मोर्चा शहराध्यक्ष संगीताताई गवळी, डॉ. महेंद्र राठोड, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ, योगेश खंडेलवाल, शहर प्रसिद्धीप्रमुख प्रवीण मराठे, माजी कार्यालय मंत्री अरुण पाटील, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, रामकुमार पाटील, महादू चौधरी, किशोर रणधीर, अजय जोशी,जितेंद्र पाटील, चेतन पाटील आदींची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत माजी खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहण्यात आला.

पुढे आमदार चव्हाण यांनी सांगितले की, मी लोकप्रतिनिधी या नात्याने मार्केट कमिटी कडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी मागितली असता त्यांनी शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर व गट नंबर सह यादी तात्काळ यादी दिली मात्र शेतकी संघाकडे मागील ८ दिवसांपासून यादी मागत आहे पण त्यांनी फक्त शेतकऱ्यांचे नाव व गाव एव्हडीच यादी दिली. शेतकी संघाचे चेअरमन म्हणतात की आम्ही पारदर्शकपपणे काम करतो मग शेतकऱ्यांची माहिती ते का लपवत आहेत ???

याबाबत मी मुख्यमंत्री, पणनमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली मात्र त्यावर त्यांचे उत्तर आले नाही. नंतर मला माहिती मिळाली की रविवारच्या दिवशी मार्केट कमिटी मधून विकत घेतलेला हरभरा हा शेतकी संघात खरेदी केला जात आहे. मी त्या १०० क्विंटल हरभरा असणाऱ्या २ गाड्या रंगेहाथ पकडून हा सर्व काळाबाजार लोकांसमोर आणला.
परत मंत्र्यांपासून ते कलेक्टर पर्यंत सर्वाना पत्र लिहून यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली व त्यांना सांगितले की येत्या १५ दिवसाच्या आत माझ्या चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्याकडे पडून असणारा कापूस, मका ज्वारी व हरभरा हा खरेदी करा अन्यथा मला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, पण बांधववानो मला सांगताना खेद वाटतो की आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे लेखी आश्वासन या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आपल्याला दिले नाही.

आज कोरोना असेल, चक्रीवादळ असेल किंवा ओला दुष्काळ असेल माझा शेतकरी राजा अडचणीत आहे. त्याने घाम गाळून पिकविलेल्या मालाला जर भाव मिळत नसेल, खरेदी केला जात नसेल तर मला आमदार म्हणून नव्हे तर शेतकऱ्याचा मुलगा म्हणून रस्त्यावर उतराव लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आपल्या मागण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवतात – रस्त्यावर उतरतात, त्यांच्या प्रश्नासाठी गट – तट – पक्ष भेद विसरून एकत्र येतात, आपले प्रश्न सोडवतात.
आपण देखील आपल्या प्रश्नांसाठी एकत्र येत या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button