Amalner

Amalner: स्वतः मध्ये बदल करा, रत्नप्रवाह प्रवचनमालेचा संदेश… रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.

Amalner: स्वतः मध्ये बदल करा, रत्नप्रवाह प्रवचनमालेचा संदेश… रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.

अमळनेर-प्रवचन हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. परिवार, मन, जीवन या तीन गोष्टीचे संरक्षण व्हावे. हा माझा प्रयत्न आहे. स्वतःमध्ये बदल करा हाच रत्नप्रवाह प्रवचन मालेचा संदेश आहे. असे अभ्यासपूर्ण मत आचार्य गुरूभगवंत रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा यांनी रत्नप्रवाह प्रवचन मालेच्या बन्सीलाल पॅलेस येथील समारोप प्रसंगी बोलत केले. या प्रसंगी प्रवचन प्रभाविक संवेगनिधींश्रीजी उपस्थित होत्या.बजरंग अग्रवाल व त्यांच्या परिवाराने गुरुभगवंताचा सन्मान केला. संपादक पूनम ठाकरे, बापुराव ठाकरे व अतिथी संपाद‌क प्रा. अशोक पवार यांनी तयार केलेल्या रत्नप्रवाह प्रवचन मालेचा विशेषांक साप्ताहिक रयत जगतच्या माध्यमातून घेवरचंद कोठारी, प्रकाश शहा, बजरंग अग्रवाल, सरजू गोकलाणी, प्राचार्य ए.बी. जैन, राजू महाले, रविंद्रसिंग कॉलरा, डॉ. भरतसिंग पाटील,शरद सोनवणे, डॉ.अक्षय कुलकर्णी यांचे शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अमळनेर शहर व तालुक्यातील प्रिंट मिडिया, व्हॉइस मीडिया, पोर्टल,साप्ताहिक या सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
“आर्ट ऑफ पॅरेन्टिंग”या विषयावर बोलतांना रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी ५ गोष्टी महत्वपूर्ण सांगितल्या.

१)गीव्ह गुड मेसेज२)गीव्ह मॅच्युरिटी३) गहि मॉरल ४)गिव्ह मॅनर्स५) गिव्ह मिनिट.

१)गिव्ह गुड मेसेज –

तुमच्या वर्तणातून चांगला मेसेज गेला पाहिजे.महात्मा गांधी म्हणत माझे जीवनच मेसेज आहे. व्यवसायात खोटे बोलू नका. एका क्षेत्रात तरी आदर्श जीवन जगले पाहिजे. तुमचा मुलगा तुम्हांला आदर्श मानतो का ?

२)गिव्ह मॅच्युरिटी –

परिपक्वता तुम्ही तुमच्या शरिरावर प्रेम करता का?शरीर ही तुमची संपत्ती आहे. शरिर, मन,आत्मा या गोष्टी सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे.शरीर माझे आहे.मी काहीही करेल. ही भुमिका चुकीची आहे .व्यसन करताना तुम्ही पत्नी, मुलांना विचारले होते का? स्वतःवर प्रेम करा.

३) गीव्ह मॉरल –

मनोधैर्य या विषयावर तुम्हांला मुलांशी अर्धा तास बोलता येईल?वडिलांचे मॉरल,प्रतिष्ठा ही मुलांसाठी प्रेरणा असते. जो मुलगा वडिलांसोबत बसू शकत नाही,त्यांच्यात कुठले आले मॉरल?

४)गीव्ह मॅनर्स-

वडिलांनी प्रेम दिले. संस्कार दिले नाही. सर्व गोष्टी व्हाट्सअप वर टाकल्या मॅनर्स शिकविले नाही. मुलांना पैसा नको, प्रेम पाहिजे.

५)गिव्ह मिनिट-

मुलांनी व वडिलांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे. कम्युनिकेशन गॅप मुळे व्यवस्था बिघडली आहे. मित्रांमुळे मुले वाया जातात,आपल्या जवळ विवेक पाहिजे. असे आग्रही प्रतिपादन रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेच्या समारोप प्रसंगी केले.यावेळी प्रचंड भाविक समुदाय उपस्थित होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button