अक्कलकोटमध्ये गोपाळ हॉटेल येथे शिवभोजन केंद्र सुरु
कृष्णा यादव,प्रतिनिधी
अक्कलकोट – अक्कलकोट शहरात गोर गरीब व गरजू लोकांसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आलंय, तरी याचा लाभ अक्कलकोट शहरातील गरीब व गरजू लोकांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अंजली मरोड यांनी केले. सदर शिवभोजन केंद्राचे उद्घाटन अक्कलकोटचे तहसीलदार अंजली मरोड व डी वाय एस पी संतोष गायकवाड यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी तहसीलदार मरोड व डी वाय एस पी संतोष गायकवाड बोलत होते. सदर शिवभोजन केंद्र अक्कलकोट येथे महाराष्ट्र शासन तर्फे शिवभोजन थाळी चे शुभारंभ बायपास रोड मंगरूळ हायस्कूल च्या पुढे गोपाळ हॉटेल येथे करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे शुभारंभ तहसीलदार अंजली मरोड, डीवायएसपी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, प्रकाश राठोड, शिवराज स्वामी, सिद्धाराम जाधव, स्वामीनाथ धनशेट्टी, बंटी राठोड, रमेश राठोड, शिवाजी नाईक, राजू पवार सर, हवालदार कुंभार साहेब, पोलीस कर्मचारी जाधव आणि बहुसंख्य गरीब लाभार्थी उपस्थित होते.