नागरिकांच्या तक्रारीनंतर चांदवड नगरपरिषदेला आली जाग अहिल्यादेवी कालीन विहिरीतून पाणी उचलण्यास सुरुवात..
उदय वायकोळे चांदवड
चांदवड : चांदवड नगरपरिषद विरोधात नागरिकांमध्ये पाण्यावरून प्रचंड असंतोष पसरला होता.डावखर नगर,वरचे गाव परिसरतील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना वारंवार निवेदने दिली होती.आज दि 31 डिसेंबर 2020 रोजी या वर्षातील शेवटची भेट घ्यावी म्हणून काही नागरिक आज निवेदन घेऊन गेले होते.
याबाबत मुख्याधिकारी यांचेशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे चांदवड शहरास होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक अनिश्चित व अनियमित होते .त्यामुळे कधी कधी रात्री उशीरा पाणी सोडले जात होते.त्यामुळे नगरपरिपरिषदेने एक स्वतंत्र कर्मचारी धोडंबे येथे filteratio plant वर नेमला असून तो MJP च्या कर्मचा-यांकडून नियमितपणे पाणी सोडले जाईल याची दक्षता घेईल.
रंगमहाल विहीरीत नवीन मोटर खरेदी करण्यात आली असून आज ती कार्यान्वित केली असून आज पाणी टाकीत पोचले आहे.त्यामुळे अतिरीक्त पाणी उपलब्ध होऊन तक्रारी कमी होतील.
खोकड तलावाचे पाणी उचलून ते सध्या बांधकाम चालू असलेल्या WTP मध्ये टाकण्याचे नियोजन केले आहे.तिथे नवीन DP टाकून पाईपलाईन जोडून 15 दिवसात हे पाणी filter पर्यंत पोचवले जाईल तिथून ते जुन्या टाक्यापर्यंत पोचवले जाईल तेव्हा अजून अतिरीक्त पाणी उपलब्ध होईल.






