? Big Breaking
19 फेब्रुवारीपासून महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे
राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या 19 फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी, असे निर्देश सर्व महाविद्यालयांना दिले आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
शाळांप्रमाणेच आता महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्येही राष्ट्रगीत गेले जाणार आहे. याविषयी राज्य शासनाने निर्णय घेतला असून, अंमलबजावणी 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीपासून होईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
दिवसाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याचे निर्देश देणारे पत्र सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहेत.