कळंब-स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक संपन्न,पीककर्ज वाटपात टाळाटाळ केल्यास आंदोलन करणार
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब तालुक्यातील प्रमुख शाखाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांची काल बैठक झाली लॉक डाऊन च्या काळात संघटनेत थोडी मरगळ आलेली होती पण आता सर्व मरगळ बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पेटून उठण्याचे काम उस्मानाबाद जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत असे असताना देखील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज विषय बँकाकडून संथ गतीने चालू आहे तसेच नवीन शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात बँका टाळाटाळ करत आहेत कृषी विभागाचे दुर्लक्ष ेतकर्यांकडे चालू आहे या सर्व बाबींचा विचार करून स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात भूमिकेत आहे असे ठरवण्यात आले.
या बैठकीस स्वभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विष्णुदास काळे तालुकाध्यक्ष कमलाकर पवार जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत दादा समुद्रे कळंब तालुका उपाध्यक्ष अजय शिंदे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख याही खाँ पठाण कळंब तालुका सरचिटणीस पंकेश पाटील माणिक घाटोळे सिताराम शितोळे सचिन डावखरे नाना पंचाळ अशोक माळी उमेश महाजन आदी शेतकरी उपस्थित होते.