Maharashtra

राजगृह वर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करून आंबेडकर घराण्याला संरक्षण प्रदान करा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेची मागणी

राजगृह वर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करून आंबेडकर घराण्याला संरक्षण प्रदान करा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेची मागणी

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर प्रतिनिधी,राजगृह संबंधित घटनेतील आरोपीना कठोर शिक्षा व्हावी आणि शासनाने संपुर्ण आंबेडकर कुंटुबियाना सुरक्षा प्रदान करणे बाबत चे निवेदन डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य उध्दवजी ठाकरे यांना अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या द्वारे देण्यात आले.

सदर निवेदनात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले राजगृहावर दिनांक-७/७/२०२० संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली असून विशेषतः घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड व घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. घरातील कुंड्यांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. सदर प्रकार दोन माथेफिरूंनी केल्याचे निदर्शनास येते. कोरोनासारख्या महा भयानक साथींच्या पार्श्वभूमीवर केलेले हे कृत्य निषेधार्ह व निंदणीय सुद्धा आहे. या प्रकरणात समाविष्ट असलेले आरोपी आणि त्यामागे कार्यरत असणाऱ्या प्रवृत्ती यांचे नेमके प्रयोजन वा हेतु काय आहे ? या मागे जातीय दंगली घडविण्याचा व आंबेडकरी समाजाची अस्मिता दुखावून त्यांना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा अप्रत्यक्ष उहेश आहे काय ?
राजगृह ही एक वास्तु नाही तर ती आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेला वाचविण्यासाठी आम्ही आपणास विनम्रपणे निवेदन करतो की,
राज्याच्या गृहखात्याकटून सर्व आरोपी आणि त्यामागील विघातक शक्ती यांना पकडून योग्य ती शिक्षा देण्याची त्वरीत कार्यवाही करावी, अश्या आशयाची मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी परिषदेचे अध्यक्ष नगरसेवक नरेंद्र संदानशीव, कार्यध्यक्ष प्रा डॉ विजय तुटे, प्रा डॉ राहुल निकम, के एम ब्रमहे, प्रा मुकुंद संदानशीव, देवदत्त संदानशीव, सोमचंद संदानशीव, ऍड एस एस ब्रमहे, यशवंत बैसाने, प्रा डॉ जाधव, विजय गाढे, अविनाश संदानशीव, प्रा बापू संदानशीव, प्रा भानुदास गुलाले, अजय भामरे आदी उपस्थित.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button