Latur

औसा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का;नव्या चेहर्‍यांना संधी मिळाल्याने परिवर्तन औसा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का;नव्या चेहर्‍यांना संधी मिळाल्याने परिवर्तन

औसा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का;नव्या चेहर्‍यांना संधी मिळाल्याने परिवर्तन औसा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का;नव्या चेहर्‍यांना संधी मिळाल्याने परिवर्तन

लक्ष्मण कांबळे लातूर

औसा : दि. 15 जानेवारी रोजी 46 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत औसा तालुक्यात प्रस्थापितांना जनतेनी धक्का दिला असून नवीन चेहर्‍यांना संधी मिळाल्याने परिवर्तनाची लाट आली आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापितांना मतदारांनी धक्का देऊन धडा शिकविला आहे. उजनी ग्रामपंचायतीमध्ये 15 पैकी 08 जागा जिंकून राष्ट्रवादीचे योगीराज पाटील यांनी वर्चस्व स्थापन केले. लामजना येथे बालाजी पाटील यांच्या पॅनेलने 17 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत. नागरसोगा येथे सेवानिवृत्त शिक्षक भास्कर सूर्यवंशी यांनी 11 पैकी 8 जागेवर ताबा मिळविला आहे. तळणी येथे सत्यवान जाधव पाटील व मोहन सावळसुरे यांच्या पॅनेलने 11 पैकी 10 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार समर्थकांना दारुण पराभव पत्करावा लागला आहे. भादा ग्रामपंचायतीसाठी अमोल पाटील हे एकमेव निवडून आले असून 13 पैकी 12 जागा जिंकून बालाजी शिंदे यांनी आपले पुनश्च वर्चस्व कायम ठेवले आहे.सेलू येथे माजी समाज कल्याण सभापती बालाजी कांबळे समर्थकांनी निर्विवाद वर्चस्व स्थापन करून 11 पैकी 10 जागा मिळविल्या आहेत. हासेगाव येथे बालाजी बावगे यांच्या पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. खरोसा ग्रामपंचायतीमध्ये 13 पैकी 11 जागा जिंकून अजय साळुंखे यांच्या पॅनेलने विजय संपादन केला आहे. भेटा येथे 11 जागेपैकी बालाजी हजारे यांच्या पॅनलला 05 जागेवर यश आले असून विरोधी दोन्ही पॅनेलला प्रत्येकी 03 जागा मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. तपसे चिंचोली येथे 11 पैकी राजेश्वर पाटील यांनी 06 जागेवर विजय संपादन केला असून नितीन कवठाळे यांना 05 जागा मिळाल्या आहेत. बेलकुंड ग्रामपंचायती मध्ये विष्णू कोळी यांनी 06 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले. लखनगाव येथे ज्ञानोबा गोडभरले समर्थकांनी 06 जागा मिळविल्या आहेत. हरेगाव ग्रामपंचायती मध्ये संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्व 11 जागा जिंकून विजयश्री खेचून आणली. तालुक्यात ग्रामपंचायतीमध्ये नवीन चेहऱ्यांना मतदारांनी पसंती दिली असून प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले आहे. औसा येथे प्रशासकीय इमारतीच्या सभागृहांमध्ये सकाळी 10 वाजता कडेकोट बंदोबस्तामध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या 9 फेऱ्यांची व्यवस्था तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी शोभा पुजारी यांनी केली होती. शहरात वाहतुकीमुळे गर्दी होऊ नये म्हणून शासकीय विश्रामगृहा पासूनच बॅरीकेट लावून रहदारी बंद केली होती.औसा पोलीस निरीक्षक ठाकूर,भादा पोलीस ठाण्याचे स पो नि संदीप भारती,स पो उ नि महेश मुळीक आणि टीम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणीनंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.तर औसा शहरात अभूतपूर्व गर्दी झाली होती. तरीही सर्व निवडणूक प्रक्रिया कोठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत संपन्न झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button