Dharangaw

सोनवद येथील नागरिकांचे विट भट्ट्या मुळे आरोग्य धोक्यात प्रदूषणाचा हाहाकार..

सोनवद येथील नागरिकांचे विट भट्ट्या मुळे आरोग्य धोक्यात प्रदूषणाचा हाहाकार..

कमलेश पाटील धरणगाव शहर प्रतिनिधी

दिनांक:- 06/02/2023 वार सोमवार :- काय ते सोनवद, काय ते तेथील वीट भट्टी, काय ते तेथील केमिकल चे प्रदूषण सगळ ओके मंधी आहे धरणगाव तालुक्यातील सोनवद येथे विट भट्ट्या चालता तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना व जवळ असलेल्या शेतात काम करणाऱ्या शेकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शहर व परिसरात वीट पांरपारिक पद्धतीने बनविली जाते, मातीचे साचे बनवून ते एकमेकावर रचून भट्टी बनवली जाते व दगडी कोळशाचे यामध्ये इंधन म्हणून उपयोग करण्यात येतो. प्रदूषण नियंत्रक मंडळानुसार, इंधन म्हणून वापरात येणाऱ्या दगडी कोळश्याच्या ज्वलनानंतर सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, आणि नायट्रोजन मधील ऑक्साईड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. या विषारी वायू मधील सल्फर डायऑक्साईडमूळे डोळ्याचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजन मधील डायऑक्साईड मूळे फुफ्फुसाचे व त्वचेचे आजार होतात, तसेच कार्बन मोनोऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड या विषारी वायुमुळे वीट भट्ट्यांच्या परिसरातील तापमानात वाढ होवून सभोवतालच्या शेतीवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होते. तेथील नागरिकांच्या सांगण्या नुसार विट भट्टीत प्रचंड प्रमाणात केमिकल चा वापर देखील केला जात आहे त्यामुळे तेथील नागरिकांचे जीव धोक्यात येत आहे सदर सोनवद येथील रहिवाशी शेतकरी भटा भिला पाटील यांनी 2021 व 2022 मध्ये प्रशासनाला वारंवार अर्ज दिले होते परंतु त्यांच्या माहिती नुसार त्यांनी वारंवार अर्ज देऊन सुद्धा अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने कुठली ही कार्यवाही किंवा चौकशी केली नाही सरकारी नियमानुसार एकावेळी ५० हजारापेक्षा कमी विटांची निर्मिती करत असल्यास त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतिपत्र बंधनकारक नसेल. मात्र ५० हजारापेक्षा जास्त वीट निर्मिती करत असतील तर अशा वीट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतिपत्र बंधनकारक राहील. तसेच एकावेळी ५० हजारांची निर्मिती केल्यानंतर तीन दिवसांनंतरच दुसरी वीट भट्टी लावण्यात यावी. वीट भट्टीचे ठिकाण एक हजार लोकसंख्या असलेल्या वस्तीपासून आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून कमीत कमी २०० मीटर अंतराच्या पुढे असावे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले आहे तरी देखील नियमांचे उल्लघन होताना दिसून येत आहे प्रदूषणाला व केमिकल ला कंटाळून नागरिकांनी योग्य ती कार्यवाही करण्याची प्रशासनाला विनंती केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button