भाजप जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी साधला पदाधिकाऱ्यांशी संवाद
कोल्हापूर प्रतिनिधी- तुकाराम पाटील
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांसाठी शासनाने सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने वाटप केलेले धान्य सामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचते का? त्यामध्ये अडचणी आहेत.
का याची तालुकानिहाय माहिती भाजपचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी घेतली आहे. तसेच या कामात सक्रिय राहावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
समरजीत सिंह घाटगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुका चे पदाधिकारी, बूथ प्रमुख, प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी ऑडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. लॉक डाऊन मुळे ग्रामीण भागातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या सोडवण्यासाठी मदत करा तसेच आपल्या परिसरातील स्थलांतरित लोकांना शक्य ती मदत करावी अशा सूचना समरजित सिंह घाटगे यांनी केले आहेत.